शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वकिलांनी वस्तुस्थिती समजून बाजू मांडावी

By admin | Updated: November 30, 2015 02:19 IST

न्यायदानासाठी न्यायाधीश आणि वकील यांच्यामध्ये चांगला समन्वय आवश्यक आहे. दाखल होणारी प्रकरणे कायद्याच्या चौकटीत बसवून समजून घ्यावी.

रवी देशपांडे : आर्णी येथील न्यायालयाचे उद्घाटनआर्णी : न्यायदानासाठी न्यायाधीश आणि वकील यांच्यामध्ये चांगला समन्वय आवश्यक आहे. दाखल होणारी प्रकरणे कायद्याच्या चौकटीत बसवून समजून घ्यावी. वकिलांनी प्रकरणे ठेवताना दिवाणी व फौजदारी कायद्याचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. हा अभ्यास प्रकरणाची मांडणी चांगल्याप्रकारे करण्यास फायदेशीर ठरतो. वस्तुस्थिती लक्षात घेऊन व्यवस्थित बाजू मांडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी केले.आर्णी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन रविवारी न्या. देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप शिरासाव, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा न्यायाधीश ए. टी. वानखडे, आर्णीचे दिवाणी न्यायाधीश ए. यू. बहीर, सहदिवाणी न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी, नगराध्यक्ष आरिज बेग, बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, आर्णी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. डी. डी. राठोड आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, न्यायालय न्याय आणि दानाचा संगम आहे. या ठिकाणी प्रत्येकास न्याय मिळणे आवश्यक आहे, ही भूमिका ठेऊन न्यायाधीश आणि वकिलांनी कार्य केले पाहिजे व आपले कर्तव्य बजावले पाहिजे. न्यायदान करताना कायद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. न्यायाधीश मंडळींनी न्याय देत असताना नि:पक्ष, निर्भीडपणे हे काम केले पाहिजे. दोन्ही बाजू समजून घेऊन कायद्यातील तरतुदी पाहून कार्य करावे. यामुळे पक्षकारास आपल्यावर अन्याय झाल्याची भावना होणार नाही. आर्णी येथील नवीन न्यायमंदिरात वकील, न्यायाधीशांच्या समन्वयाने चांगले निर्णय लागतील, असे न्या. देशपांडे यांनी सांगितले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप शिरासाव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. आर्णी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायमंदीरात जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले. आर्णी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. डी. डी. राठोड यांनी प्रास्ताविक केले. सुरूवातील फित कापून तसेच नामफलकाचे अनावरण करून मान्यवरांच्या हस्ते न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. इमारतीच्या उभारणीसाठी उत्कृष्ठ काम केल्याबद्दल बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आर्णी वकील संघाच्यावतीने काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही झाले. सूत्रसंचालन न्या. योगिता तिवारी यांनी केले. तर आभार न्या. ए. यू. बहीर यांनी मानले. कार्यक्रमास न्यायाधीश, वकील मंडळी उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)