शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष पुरके यांच्या निर्णयाकडे

By admin | Updated: May 21, 2016 02:30 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले ....

भाजपही डाव साधण्याच्या तयारीत : राळेगाव बाजार समिती निवडणूकराळेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले असताना काँग्रेसचे नेते व माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके कोणता निर्णय घेतात याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचे कार्यकर्तेही डाव साधण्याच्या तयारीत आहे. राळेगाव तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांची पकड आहे. १९९९ ते २००४ या पंचवार्षिकनंतर पुढे सन २०१० ते आजतागायत ते बाजार समितीचे सभापती आहेत. जोडीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. बाजार समिती स्वत:च्या हातात ठेवण्यासाठी तिसऱ्या टर्मसाठी त्यांचे प्रयत्न या वेळीही सुरू आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादीचा प्रवास दोन वर्षात पूर्ण करून घरवापसी झाल्यानंतर आणि त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकीत पक्षाची ताकद वाढण्याऐवजी घटल्यामुळे कार्यकर्ते काँग्रेसच्या भविष्याप्रती चिंतीत झाले आहे. त्यामुळे प्रा. पुरके यावेळी प्रफुल्ल मानकर, काँग्रेस कार्यकर्ते व दोन्हीबाबत नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे काँग्रेसजणांचे लक्ष लागले आहे.प्रा. पुरके यावेळी जो काही निर्णय घेईल त्याचा परिणाम बाजार समितीच्या निवडणुकीवर होईलच, पण त्यापेक्षा अधिक परिणाम आगामी काळात काँग्रेस पक्षावर व २०१९ मध्ये ते लढणार असलेल्या विधानसभा निवडणुकीवरही निश्चित होणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला या निवडणुकीत अत्याधिक महत्त्व आले आहे. पुढील काळात अवघ्या सहा महिन्यांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, वसंत सहकारी जिनिंग, सहकारी बँक आदींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहे. यावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. भाजपच्या वाढत जात असलेल्या प्रभावाचा सामना करण्याकरिता प्रा. पुरके यांच्या बाजार समिती संदर्भातील निर्णयाला अत्याधिक महत्त्व आले आहे. एक व्यक्ती, एक पद की अनेक पदाबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे ३० सप्टेंबर २०१५ रोजी बाजार समितीचा कार्यकाळ संपला. पण, आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी वेळीच हालचाली करून त्यावर प्रशासक बसविण्यात ते असमर्थ राहिले. बाजार समितीसंदर्भातील वेळोवेळी चर्चित राहिलेले विविध प्रकार, गैरप्रकारावर वेळोवेळी लक्ष घालून कारवाई, चौकशा करविण्यात आल्या नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज राहिले होते. पण आता बदललेल्या परिस्थितीत आमदार उईके यांनी सुरू केलेली कामे आणि होऊ घातलेल्या विविध निवडणुकांमध्ये संधीचा लाभ उचलण्यासाठी भाजपनेही गंभीरपणे प्रयत्न सुरू केले आहे. मतदारयादीवरच तब्बल ११ आक्षेप दाखल करून त्यांनी गंभीरतेची चुणूक दाखविली. निर्णयात आक्षेप फेटाळले गेले असले तरी भाजप किती आक्रमक होत आहे, हे दिसून येत आहे. सेनेच्या ताब्यातही काही ग्रामपंचायती आहेत. या पक्षाचे पदाधिकारी वाशिम-यवतमाळच्या निर्देशानुसार काम करतात की स्थानिकस्तरावर त्याबाबत निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. या संस्थेच्या निवडणुकीकडे तालुक्यातील संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)