शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष पुरके यांच्या निर्णयाकडे

By admin | Updated: May 21, 2016 02:30 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले ....

भाजपही डाव साधण्याच्या तयारीत : राळेगाव बाजार समिती निवडणूकराळेगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले असताना काँग्रेसचे नेते व माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके कोणता निर्णय घेतात याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाचे कार्यकर्तेही डाव साधण्याच्या तयारीत आहे. राळेगाव तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर यांची पकड आहे. १९९९ ते २००४ या पंचवार्षिकनंतर पुढे सन २०१० ते आजतागायत ते बाजार समितीचे सभापती आहेत. जोडीला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. बाजार समिती स्वत:च्या हातात ठेवण्यासाठी तिसऱ्या टर्मसाठी त्यांचे प्रयत्न या वेळीही सुरू आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादीचा प्रवास दोन वर्षात पूर्ण करून घरवापसी झाल्यानंतर आणि त्यानंतर झालेल्या विविध निवडणुकीत पक्षाची ताकद वाढण्याऐवजी घटल्यामुळे कार्यकर्ते काँग्रेसच्या भविष्याप्रती चिंतीत झाले आहे. त्यामुळे प्रा. पुरके यावेळी प्रफुल्ल मानकर, काँग्रेस कार्यकर्ते व दोन्हीबाबत नेमका कोणता निर्णय घेतात, याकडे काँग्रेसजणांचे लक्ष लागले आहे.प्रा. पुरके यावेळी जो काही निर्णय घेईल त्याचा परिणाम बाजार समितीच्या निवडणुकीवर होईलच, पण त्यापेक्षा अधिक परिणाम आगामी काळात काँग्रेस पक्षावर व २०१९ मध्ये ते लढणार असलेल्या विधानसभा निवडणुकीवरही निश्चित होणार आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला या निवडणुकीत अत्याधिक महत्त्व आले आहे. पुढील काळात अवघ्या सहा महिन्यांनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, वसंत सहकारी जिनिंग, सहकारी बँक आदींच्या निवडणुका घेतल्या जाणार आहे. यावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. भाजपच्या वाढत जात असलेल्या प्रभावाचा सामना करण्याकरिता प्रा. पुरके यांच्या बाजार समिती संदर्भातील निर्णयाला अत्याधिक महत्त्व आले आहे. एक व्यक्ती, एक पद की अनेक पदाबाबतही निर्णय घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे ३० सप्टेंबर २०१५ रोजी बाजार समितीचा कार्यकाळ संपला. पण, आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी वेळीच हालचाली करून त्यावर प्रशासक बसविण्यात ते असमर्थ राहिले. बाजार समितीसंदर्भातील वेळोवेळी चर्चित राहिलेले विविध प्रकार, गैरप्रकारावर वेळोवेळी लक्ष घालून कारवाई, चौकशा करविण्यात आल्या नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्ते नाराज राहिले होते. पण आता बदललेल्या परिस्थितीत आमदार उईके यांनी सुरू केलेली कामे आणि होऊ घातलेल्या विविध निवडणुकांमध्ये संधीचा लाभ उचलण्यासाठी भाजपनेही गंभीरपणे प्रयत्न सुरू केले आहे. मतदारयादीवरच तब्बल ११ आक्षेप दाखल करून त्यांनी गंभीरतेची चुणूक दाखविली. निर्णयात आक्षेप फेटाळले गेले असले तरी भाजप किती आक्रमक होत आहे, हे दिसून येत आहे. सेनेच्या ताब्यातही काही ग्रामपंचायती आहेत. या पक्षाचे पदाधिकारी वाशिम-यवतमाळच्या निर्देशानुसार काम करतात की स्थानिकस्तरावर त्याबाबत निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे. या संस्थेच्या निवडणुकीकडे तालुक्यातील संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)