शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रशासनाची दवंडी

By admin | Updated: January 17, 2015 00:18 IST

कुठल्याही निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.

यवतमाळ : कुठल्याही निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावागावात जाऊन दवंडी पिटावी असे स्वतंत्र आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहे. मार्च आणि जूनमध्ये याचा टप्पा येतो. यापूर्वी प्रत्येक जिल्हा प्रशासनाने जात वैधता प्रमाणपत्र स्वतंत्र जनजागृती मोहीम हाती घेणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक आरक्षीत संवर्गातील जागेसाठी उमेदवारच मिळाले नाहीत. ही अडचण लक्षात घेता शक्य होईल त्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने जात वैधता प्रमाणपत्राच्याबाबतीत जागृती करावी यासाठी गावातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी पथनाट्य अथवा दवंडीच्या माध्यमातून याची माहिती द्यावी, ग्रामसभांमध्ये शिबिर घेण्यात यावे असे निर्देश आयोगाने दिले.महानगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. या संस्थांमधील निवडणुकीच्या आधी प्रभाग रचना आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला जातो. त्यामुळे आरक्षण जाहीर होताच ज्या ठिकाणी आरक्षीत जागा आहेत अशा ठिकाणी व्यापक प्रसिद्धी माध्यमांचा वापर करून उमेदवारांमध्ये जागृती करावी. जेणेकरून उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे ती जागा रिक्त राहू नये, अशी तसदी जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. त्यासाठी व्यापक मोहीम कशी राबवावी याच्या टिप्स राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र काढून घ्यावे, त्यासाठीची प्रक्रिया काय याबाबत दवंडी दिली जाणार आहे. इतर प्रसिद्धी माध्यमातून प्रसार केला जाणार आहे. एकंदर हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थेतील मोठी उणीव दूर करण्यासाठी उपयोगी ठरणारा आहे. यापूर्वी आरक्षीत जागेसाठी केवळ जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने उमेदवारच मिळत नव्हते. त्यामुळे ६१ टक्के आरक्षीत जागेपैकी ४१ टक्के पदे रिक्त रहात होती. ही अडचण दूर करण्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगानेच स्वतंत्र कार्यक्रम आखून दिला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)