शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नेतृत्वावर कार्यकर्ते नाराज

By admin | Updated: July 18, 2014 00:19 IST

यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वावर पक्षाचे सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर नजर टाकल्यास कार्यकर्त्यांची ही नाराजी रास्तच असल्याचे कुणालाही मान्यच करावे

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वावर पक्षाचे सामान्य कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर नजर टाकल्यास कार्यकर्त्यांची ही नाराजी रास्तच असल्याचे कुणालाही मान्यच करावे लागेल. कधी काळी राज्याला तब्बल १३ वर्ष नेतृत्व देणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात आज काँग्रेसची वाताहत झाली आहे. म्हणायला काँग्रेसचे पाच आमदार दिसत असले तरी त्यांनी पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काय केले, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद यवतमाळ जिल्ह्याकडे आहे. परंतु जिल्ह्याला त्याचा काही एक फायदा झाला नाही. पाच आमदार, त्यातील दोघांकडे लालदिवा, स्वत: प्रदेशाध्यक्ष या जिल्ह्याचे असूनही काँग्रेसच्या पदरी काहीच पडू शकलेले नाही. जिल्हा परिषद, नगरपरिषदा, पंचायत समित्या, जिल्हा बँक, सहकारातील संस्था यातील काहीच काँग्रेसच्या हाती नाही. त्यामुळेच काँग्रेसचे पाच आमदार असून पक्षाला उपयोग काय, असा प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे. विद्यमान मंत्री-आमदार व प्रदेशाध्यक्षांच्या कार्यकाळात यवतमाळ जिल्ह्याची काँग्रेस प्रचंड माघारली. होत्याचे नव्हते झाले. नवे काही तर मिळाले नाहीच, उलट जवळ असलेलेही अन्य पक्षांनी हिसकावून नेले. कार्यकर्त्यांना मंडळ, महामंडळ, समित्याही देता आलेल्या नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या या नेतृत्वाविरोधात कार्यकर्त्यांनी उघड बंड पुकारले आहे. गेल्या महिन्यात १६ पदाधिकाऱ्यांनी या नेत्यांवर जाहीर नाराजी व्यक्त केली. तर दोन दिवसांपूर्वी यवतमाळ नगरपरिषदेत काँग्रेसची झालेली दुरवस्था पाहून माजी नगराध्यक्षांनी नेत्यांवर तोंडसुख घेतले. या स्वार्थी नेत्यांचा ‘मी आणि माझा मुलगा’ हा डाव आता कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनीसुद्धा ओळखला आहे. त्यामुळेच या नेत्यांचा आगामी विधानसभेतील प्रवास चांगलाच खडतर बनणार आहे. पाच वर्षात काय केले, हे मतदारांपुढे दाखविण्यासाठी या नेत्यांकडे काहीच नाही. यावेळी मतदारच नव्हे तर पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा या नेत्यांना गावागावात जाब विचारण्यासाठी सज्ज आहेत. लोकसभेत पानीपत झाले असतानाही काँग्रेसचे नेते अद्याप हारतुऱ्यातून बाहेर निघायला तयार नाहीत. राज्यभरातील पक्षाच्या नवनियुक्त विधान परिषद सदस्य आणि शेजारच्या खासदाराचा सत्कार शुक्रवारी येथे आयोजित आहे. वास्तविक या लोकप्रतिनिधींचा आपल्या जिल्ह्यात काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार झाला आहे. त्यामुळे पुन्हा हे आयोजन कशासाठी असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहे. काही दिवसांपूर्वीच्या बंडानंतर यानिमित्ताने एकजूट दाखविण्याचा प्रयत्न होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)