शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास कारवाई

By admin | Updated: February 18, 2017 00:36 IST

लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास

दहावी, बारावी परीक्षा तयारीचा आढावा : भरारी पथकांना केले अधिक क्रियाशील यवतमाळ : लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास सबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिले. दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तयारीचा आढावा सभेत ते बोलत होते. दहावी, बारावीच्या परीक्षा संपूर्णलणे कॉपीमुक्त वातावरणात पडाव्या. परीक्षा केंद्रावर कॉपी करणे किंवा त्यासाठी सहकार्य करणे गुन्हा आहे. असे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. परीक्षा पार पाडण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या दक्षता समितीची सभा महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शिक्षणाधिकारी माध्यमिक चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुचिता पाटेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गायनर, निरंतर शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर आदी उपस्थित होते. बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या परीक्षेचे जिल्ह्यात १०४ केंद्र असून ३५ हजार ५०२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा सात मार्चपासून सुरू होत आहे. त्यासाठी १४९ केंद्रांवरून ४३ हजार ८६३ विद्यार्थी परीक्षा देतील. या केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी बैठे पथके, भरारी पथके नेमन्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. भरारी पथकांमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी अशा अधिकाऱ्यांचा समावेश राहिल. तर बैठे पथकात मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषि विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. परिक्षा केंद्रावर त्याच शाळेच्या मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख म्हणून नेमू नये तसेच परीक्षा केंद्रावर संबंधित शाळांच्या शिक्षकांना नेमू नये असेही त्यांनी सांगितले. केंद्रावर तीन तासाच्या दरम्यान वेगवेगळ्या भरारी पथकांच्या भेटी होतील. किमान तीनदा प्रत्येक केंद्रावर भेटी होतील, असे नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. पर्यवेक्षक किंवा अन्य परीक्षा कर्मचारी, अधिकाऱ्यांनी गैरप्रकारासाठी सहकार्य केल्यास त्यांच्यावरही फौजदारी दाखल करावी, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)