शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

सेवा, शिस्तीचा भंग करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 21:51 IST

कोणत्याही क्षुल्लक प्रकरणांवरून उठसूट न्यायालयात धाव घेणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभाग : उठसूट कोर्टात जाणाºयांवर बडगा, बदली प्रकरणे अधिक

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कोणत्याही क्षुल्लक प्रकरणांवरून उठसूट न्यायालयात धाव घेणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतत चर्चेत असतो. मुख्यालयी न राहाणे, वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात बाह्यरूग्ण तपासणी न करणे, सतत तक्रारी करणे, कोणत्याही कारणावरून थेट न्यायालयात धाव घेणे, औद्योगिक न्यायालयातून साध्या विषयांवर स्टे आणणे, आदी बाबींमुळे आरोग्य विभाग जेरीस आला आहे. अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी जाणवत आहे. प्रामाणिकपणे कार्य करणाºयांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. यामुळे आरोग्य विभाग उठसूट न्यायालयात धाव घेणाºयांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्याच्या निर्णयाप्रत पोहोचला आहे.आरोग्य कर्मचारी बदलीप्रकरणी मोठ्या प्रमाणात न्यायालयात धाव घेतात. बदली, समायोजनातून वाद झाल्याने अनेक प्रकरणे न्यायालयात पोहोचली आहे. तथापि, न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी कुणीही विभागाची पूर्वपरवानगी घेत नाही. परस्पर प्रकरण न्यायालयात दाखल करून ते मोकळे होतात. न्यायालयाच्या नोटीसनंतरच ही बाब विभागाला अवगत होते. त्यामुळे कामकाजावर परिणाम होतो. वास्तविक न्यायालयात जाण्यापूर्वी संबंधित कर्मचाºयाने संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते, असे सांगण्यात येते. अन्यथा तो सेवा, शिस्तीचा भंग ठरतो. मात्र आत्तापर्यंत याबाबीकडे कुणीही गांभीर्याने बघितले नाही. आता मात्र जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग उठसूट न्यायालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर सेवा, शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीला लागला आहे.कुणीच घेतली नाही परवानगीन्यायालयात जाणाºया जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी विभागाची परवानगी घेतली नाही. त्यांनी थेट न्यायालयात प्रकरण दाखल केले, असे उघडकीस येत आहे. विशेष म्हणजे असाच प्रकार जिल्हा परिषदेच्या इतरही विभागात आहे. विभागाची अथवा विभाग प्रमुखाची कोणतीही परवानगी न घेता थेट न्यायालयात जाणे म्हणजे सेवा आणि शिस्तीचा भंग असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड उगारला जाण्याचे संकेत आहे.