शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

सेवा, शिस्तीचा भंग करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 21:51 IST

कोणत्याही क्षुल्लक प्रकरणांवरून उठसूट न्यायालयात धाव घेणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभाग : उठसूट कोर्टात जाणाºयांवर बडगा, बदली प्रकरणे अधिक

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कोणत्याही क्षुल्लक प्रकरणांवरून उठसूट न्यायालयात धाव घेणाऱ्या आरोग्य अधिकारी, कर्मचाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सतत चर्चेत असतो. मुख्यालयी न राहाणे, वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात बाह्यरूग्ण तपासणी न करणे, सतत तक्रारी करणे, कोणत्याही कारणावरून थेट न्यायालयात धाव घेणे, औद्योगिक न्यायालयातून साध्या विषयांवर स्टे आणणे, आदी बाबींमुळे आरोग्य विभाग जेरीस आला आहे. अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी जाणवत आहे. प्रामाणिकपणे कार्य करणाºयांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत आहे. यामुळे आरोग्य विभाग उठसूट न्यायालयात धाव घेणाºयांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्याच्या निर्णयाप्रत पोहोचला आहे.आरोग्य कर्मचारी बदलीप्रकरणी मोठ्या प्रमाणात न्यायालयात धाव घेतात. बदली, समायोजनातून वाद झाल्याने अनेक प्रकरणे न्यायालयात पोहोचली आहे. तथापि, न्यायालयात प्रकरण दाखल करण्यासाठी कुणीही विभागाची पूर्वपरवानगी घेत नाही. परस्पर प्रकरण न्यायालयात दाखल करून ते मोकळे होतात. न्यायालयाच्या नोटीसनंतरच ही बाब विभागाला अवगत होते. त्यामुळे कामकाजावर परिणाम होतो. वास्तविक न्यायालयात जाण्यापूर्वी संबंधित कर्मचाºयाने संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते, असे सांगण्यात येते. अन्यथा तो सेवा, शिस्तीचा भंग ठरतो. मात्र आत्तापर्यंत याबाबीकडे कुणीही गांभीर्याने बघितले नाही. आता मात्र जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग उठसूट न्यायालयात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर सेवा, शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीला लागला आहे.कुणीच घेतली नाही परवानगीन्यायालयात जाणाºया जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी विभागाची परवानगी घेतली नाही. त्यांनी थेट न्यायालयात प्रकरण दाखल केले, असे उघडकीस येत आहे. विशेष म्हणजे असाच प्रकार जिल्हा परिषदेच्या इतरही विभागात आहे. विभागाची अथवा विभाग प्रमुखाची कोणतीही परवानगी न घेता थेट न्यायालयात जाणे म्हणजे सेवा आणि शिस्तीचा भंग असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड उगारला जाण्याचे संकेत आहे.