शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

नाम फाऊंडेशनने घेतली कृती समितीची दखल

By admin | Updated: April 28, 2016 02:24 IST

संपूर्ण महाराष्ट्राला जलसंकटातून, शेतकरी आत्महत्यांपासून आणि वर्षानुवर्षे दारिद्र्यात जीवनयापन करणाऱ्या तळागाळातील माणसांच्या जीवनात ...

प्रशंसनीय कार्य : जिल्ह्यात जल आणि वन संपदेला परिपूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनउमरखेड : संपूर्ण महाराष्ट्राला जलसंकटातून, शेतकरी आत्महत्यांपासून आणि वर्षानुवर्षे दारिद्र्यात जीवनयापन करणाऱ्या तळागाळातील माणसांच्या जीवनात उभारी आणण्याचा विडा उचलेल्या सिनेकलावंत नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उमरखेडला भेट देवून कृती समितीच्या कार्याचे मंगळवारी कौतुक केले. नाम फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक हरिश इथापे यांच्यासह श्याम पेटकर, ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष मंगेश चोरे, पुसदचे समन्वयक स्वप्नील देशमुख व इतर कार्यकर्त्यांचा या पथकात समावेश होता. उमरखेड परिसरात सुरू असलेल्या अंबोना तलाव कृती समितीच्या कार्याची पाहणी करून कौतुक केले. तलाव पुनर्निमाण कार्याची पाहणी झाल्यानंतर विश्रामगृहावर या चमूने पत्रकारांशी संवाद साधत नाम फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. नाम फाऊंडेशनचे कार्य अतुलनीय असून ज्या माणसाने म्हणजेच नाना पाटेकरांनी हे काम हाती घेतले आहे, ती एक व्यक्ती नसून वृत्ती असल्याचे सांगितले. पाण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर या भागातील लोक एकत्र आले, प्रसार माध्यमांनीसुद्धा त्यांना चांगली साथ दिली. त्यामुळे आपण भारावून गेल्याचे इथापे म्हणाले. यवतमाळ जिल्ह्याला जल आणि वन संपदेने परिपूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र काम केले पाहिजे. अंबोना तलावाप्रमाणेच लेंडी नाला व लोणाळा नाल्याचे काम एकत्रिकरणातून केल्यास या भागातील जलसंपदा वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाम संघटना स्वत:हून कुणालाही एक पैसाही वर्गणी मागत नाही. ज्यांची देण्याची इच्छा असेल ते संघटनेच्या केंद्रीय खात्यात स्वच्छेने देणगी जमा करू शकतात. तसेच या संघटनेत कुणीही पदाधिकारी नसून सगळे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे मानापमानाची भानगडच नाही. संपूर्ण कार्याचे केंद्रबिंदू नाना आहेत, असेही त्यांनी सांगितले. नाम संघटनेने आतापर्यंत विदर्भ, मराठवाड्यात भरीव कार्य केले असून हे काम अव्याहत चालू राहणार आहे. त्यामध्ये नामतर्फे शेतकरी समस्या, विधवा महिलांच्या समस्या, पाणीटंचाई, गोरगरीब लोकांच्या उत्थापनासाठी संघटना कार्य करीत आहे. आतापर्यंत जवळजवळ दोन हजार २०० विधवा महिलांना प्रतिमहिला १५०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान दिले आहे. गरजू कुटुंबांना ४०० शेळ्यांचे वाटप, विदर्भात ४०० म्हशींचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी उमरखेड तलाव कृती समितीने अवघ्या दोन तासात लोकांकडून जमविलेला दोन लाख ५० हजार रुपयांचा निधी नामच्या खात्यात वर्ग केल्याचे कृती समितीचे अध्यक्ष नितीन भुतडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सहकार्यातून दुष्काळावर मात शक्यपुसद येथील अंबोना विकास कृती समितीकडून उल्लेखनिय काम सुरू आहे. त्यांच्या या कामाला जनतेचे सहकार्य लाभत आहे. आदेशजी जैन यांच्या कुटुंबियांकडून २७ हजार रुपयांची रोख मदत या समितीला देण्यात आली. अंबोनातील गाळ उपसा करण्याच्या कामात नागरिक स्वत: पुढाकार घेत आहेत. अशा पद्धतीने सर्व नागरिकांनी आपापल्या परिने या अभियानात सहभाग घेऊन शक्य ती मदत केल्यास दुष्काळी परिस्थितीवर निश्चितच मात करता येऊ शकते, असे मत अंबोना कृती समितीचे राजू जयस्वाल यांनी व्यक्त केले आहे.