शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये कृषी केंद्रांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:31 IST

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणीच्या विषबाधा प्रकरणी प्रशासनाने आता कडक धोरण अवलंबले आहे.

ठळक मुद्देकिटकनाशकाचे प्रकरण : कृषी विभागाच्या धाडीत वास्तव उघड

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाºया फवारणीच्या विषबाधा प्रकरणी प्रशासनाने आता कडक धोरण अवलंबले आहे. कृषी केंद्रांची तपासणी सुरू केली असून पुसद येथे करण्यात आलेल्या तपासणीत तीन केंद्रांत अवैध व विनापरवाना कीटकनाशके विकल्याचे पुढे आले. त्यावरून या तीनही कृषी केंद्रांवर कृषी विभागाने कारवाई केली आहे.जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली. समितीत उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय कृषी अधिकारी पी.जी. नाईक, तालुका कृषी अधिकारी पी.एन. राठोड, कृषी अधिकारी शंकर राठोड, मंडळ कृषी अधिकारी के.एस. राठोड, कृषी सहायक सचिन राठोड, भाऊ महिंद्रे, भाऊ दीक्षित यांचा समावेश आहे. या पथकाने शहरातील कृषी केंद्रांची तपासणी केली, त्यावेळी दत्त कृषी केंद्र, राजदीप कृषी केंद्र, कन्हैया कृषी केंद्र पुसद यांच्याकडे विनापरवाना विक्रीस ठेवलेले कीटकनाशके आढळून आले. या तीनही कृषी केंद्रावर कृषी साहित्य विक्रीबंदचा आदेश देण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी पी.एन. राठोड यांनी दिली.या धडक कारवाईमुळे अवैधरीत्या व बोगस बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदींची विक्री करणाºया कृषी केंद्र चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तालुक्यात ही कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यात फवारणीतून झालेल्या विषबाधेने आतापर्यंत १९ जणांचा बळी गेला असून ६०० वर शेतकरी विषबाधित आहे.प्रशासनाने आता दखल घेतली आहे. परंतु यापूर्वीच दखल घेवून कृषी केंद्रांवर कारवाई केली असती तर अनेक शेतकºयांचे प्राण वाचले असते, असे शेतकºयांचे म्हणणे आहे. कृषी विभागाने सुरुवातीपासूनच अशी तत्परता दाखविली असती तर आज ही वेळ आली नसती.संचालकांची बैठककीटकनाशके फवारणीबाधित होणाºया शेतकरी, शेतमजुरांच्या प्रकरणानंतर कृषी विभागाने तातडीने शहरातील कृषी निविष्ठा संचालकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत फवारणीतून विषबाधा होवू नये म्हणून प्रचार व प्रसार करण्याची सूचना देण्यात आली. तसेच कृषी विभागाच्या कृषी सहायकांमार्फत ग्रामीण भागात जावून शेतकºयांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आली. तसेच शेतकºयांना माहितीपत्रके वाटण्यात आली.