शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

दोन शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: November 2, 2014 22:39 IST

जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निंभा (ता.दिग्रस) येथे थे्रशरमध्ये अडकून तर फुलसावंगीनजीक वाहन अपघातात शेतकरी ठार झाला.

यवतमाळ : जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निंभा (ता.दिग्रस) येथे थे्रशरमध्ये अडकून तर फुलसावंगीनजीक वाहन अपघातात शेतकरी ठार झाला. दिग्रस येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, निंभा येथील अरुण किसन लोखंडे (४०) हे गजानन गणथडे यांच्या शेतात थ्रेशरने सोयाबीन काढत होते. या मशीनमध्ये अडकलेले गवत काढताना अडकून अरुण लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी थ्रेशर मशीन खोलून मृतदेह बाहेर काढण्यात आला. अरुण लोखंडे याच्या मागे पत्नी, सहा मुली, मुलगा व मोठा आप्त परिवार आहे. पंचनामा आणि पुढील कारवाई दिग्रस पोलीस ठाण्याचे श्याम लांडगे, संजय नेटके, किसन राठोड यांनी पार पाडली. उत्तरीय तपासणी घटनास्थळीच डॉ. प्रशांत रोकडे यांनी केली. यावेळी पोलीस कर्मचारी कुमरे, मुनेश्वर आदी उपस्थित होते.फुलसावंगी येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, शेतातील कापूस विक्रीसाठी आणताना वाहन उलटून झालेल्या अपघातात शेतकरी ठार झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शिरपुल्ली ते फुलसावंगी दरम्यान घडली. परसराम भिक्कू राठोड (४५) रा. इवळेश्वर ता. माहूर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. परसराम हे एम.एच.२६-एच-४८९२ या अ‍ॅपेने आपल्या शेतातील कापूस विक्रीसाठी फुलसावंगी येथे आणत होते. दरम्यान खराब रस्त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अ‍ॅपे उलटला. यात शेतकरी परसराम राठोड हे ठार झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे. घटनेची तक्रार दत्ता भिक्कू राठोड (रा. घमापूर) यांनी दराटी पोलिसात दिली. ठाणेदार सागर इंगोले, पोलीस उपनिरीक्षक पंधरे, पोलीस शिपाई गेडाम, विजय चव्हाण, संभाजी मारकवार यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना येथे रवाना केला. शिरपुल्ली ते फुलसावंगी हा मराठवाडा ते विदर्भाला जोडणारा एकमेव मुख्य रस्ता आहे. त्यावर प्रचंड खड्डे पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग महागाव अंतर्गत येत असलेल्या या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. जागोजागी पडलेले खड्डे आणि उखडलेली गिट्टी यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. अशाच प्रकारातून घडलेल्या घटनेत शेतकऱ्याचा नाहक बळी गेला.