शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहनांमुळे अपघातात वाढ

By admin | Updated: May 20, 2014 23:57 IST

काळी-पिवळी व इतर वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सध्या जिल्ह्यात सुरू असल्याचे दिसून येते. लग्नसराई असल्यामुळे प्रत्येकाला वेळेवर पोहचण्याची घाई

यवतमाळ : काळी-पिवळी व इतर वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सध्या जिल्ह्यात सुरू असल्याचे दिसून येते. लग्नसराई असल्यामुळे प्रत्येकाला वेळेवर पोहचण्याची घाई आणि एसटी बसेसचा तुटवडा यामुळे अनेकजण नाईलाजास्तव खासगी अवैध वाहनांतून प्रवास करतात. यामुळे अपघातांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. आठ ते दहा व्यक्ती बसू शकतील, अशा वाहनांमध्ये २० ते २५ लोकांना कोंबून भरले जाते. चालकाजवळही नियमाबह्यरित्या प्रवाशांना बसविले जाते. यामुळे चालक योग्यरित्या वाहनसुद्धा चालवू शकत नाही. लहान वाहनांमध्ये माणसांना जनावरांसारखे कोंबून वाहनधारक प्रवास करीत आहेत. याकडे पोलिसंच्या वाहतूक शाखेचे आणि उपप्रादेशिक कार्यालयाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. कमी वेळात अधिक पैसा कमविण्याच्या नादात अवैध प्रवासी वाहनधारक वाटेल तसे प्रवासी कोंबत आहेत. धोकादायक प्रवास करीत अपघाताला निमंत्रण देत आहे.या प्रकारामुळे अपघाताचे प्रमाण वाढीस लागले आहे. मात्र याचे कुणालाही सोयरसुतक नाही. सध्या लग्नसराईमुळे अवैध प्रवासी वाहतुकदारांचे चांगलेच फावत असून हप्ता वसुलीमुळे पोलिसही दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे. एकाच दिवशी अनेक विवाहांचे मुहूर्त असल्यामुळे नातेवाईकांच्या मित्रमंडळींच्या विवाह समारंभांना उपस्थिती लावण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीला घराबाहेर पडावे लागत आहे. लग्नासाठी उपस्थिती दाखविण्यासाठी घरातील लहानमोठे वेगवेगळ्या विवाह समारंभासाठी जात असतात. उन्हाळी सुटी, लग्नसराई असल्याने रस्त्यावरही वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. परिवहन मंडळाच्या बसमध्ये जागाच मिळत नसल्याने अनेक पाहुणे मंडळी मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. वाहन चालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून भरधाव वेगाने वाहने चालवितात. वºहाड्यांची गाडी चालविणार्‍यांना आपल्या वाहनात किती प्रवासी आहे, याचे भान राहत नाही. त्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना होत आहेत. अपघात होऊ नये यासाठी कोणताही वाहन चालक स्वत:ची व प्रवाशांची काळजी घेताना दिसत नाही. लग्नसमारंभाला जाणार्‍या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिरस वाढत आहे. तरीही कुणीही खबरदारीचा प्रयत्न करीत नाही. वाहन चालकाच्या दुर्लक्षामुळे अनेक निष्पाप वºहाडींना आपल्या प्राण्यास मुकावे लागल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यापासून कोणीही बोध घेताना दिसत नाही. ग्रामिण भागात एसटी बसेसचा सर्वाधिक तुडवडा आहे. आतील गावांमधील नागरिकांना तर एसटी बस दिसणेच कठिण झाले आहे. अशावेळी सर्रास अवैध वाहनांचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नसतो. परिसरात लग्नसराईत खचाखच भरुन प्रवासी वाहने भरधाव धावत आहे. वाहनात जागा मिळेल तेथे प्रवासी बसविले जाते. बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने वाहनांच्या कॅबीनवर, छतावर प्रवासी बसत आहेत. अनेकदा उभे राहून प्रवास करीत असतात. रस्त्यावर अनेक धोकादायक वळणांवर जीव मुठीत घेऊन लोंबकळत प्रवास करताना अनेकजण दिसतात. चालकाच्या कॅबिनवरील टपावर बसलेल्यांना विद्युत वहन तारा व झाडांच्या फांद्या तुडवित जीवेघेणा प्रवास करावा लागतो. असे चित्र पाहणार्‍यांचा थरकाप उडविणारे असते. यावर पोलिसांचा वाहतूक विभाग किंवा प्रादेशिक विभागातर्फे कोणतीही कारवाई होत नसल्याने अशा रितीने अधिक नफा कमविण्याच्या हव्यासापोटी वाहतूक करणार्‍या वाहनधारकांचे चांगलेच फावते. सर्वसामान्यांना आढळणार्‍या या प्रश्नाकडे संबंधित वाहतूक विभाग व उपप्रादेशिक विभाग कारवाई का करीत नाही, हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. (प्रतिनिधी)