शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

‘एसटी’तील कोरोना बळींसाठी अपघात सहायता निधी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 21:15 IST

‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे.

ठळक मुद्देकर्तव्य बजावताना गमावला जीव

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून कुटुुंबाच्या बँक खात्यात ही रक्कम टाकली जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही लोकवाहिनी लोकांच्या सेवत होती. ही सेवा देताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. या कर्मचाºयांना विम्याचे कवच पुरविण्यात आले. मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. महामंडळातील १४४६ अधिकारी, कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले. यातील ८९० जण बरे झाले आहे. मात्र उपचार घेत असताना ४४ जणांचा जीव गेला. सद्यस्थितीत ५९२ कर्मचारी कोरोनाग्रस्त आहे. त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार केले जात आहे.

दिवंगत कर्मचाºयांना विम्याचे कवच असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ठरल्यानुसार ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. यासाठी लागणाºया रकमेची तरतुदही महामंडळाला करावी लागली. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकीटावर अपघात सहायता निधी कपात केला जातो. या निधीचा उपयोग बस अपघातात ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी केला जातो. चार वर्षांपासून हा निधी गोळा केला जातो. यातूनच काही रक्कम खर्च झाली आहे. या निधीचे काही महिन्यापर्यंत २०० कोटी महामंडळाकडे जमा होते.

या जमा रकमेतून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या अपघात सहायता निधी विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली आहे. ५० लाखांची पूर्तता करण्यासाठी लागणारा निधी अपघात सहायता निधी विश्वस्त मंडळाकडून विभागाच्या मागणीनुसार वर्ग करण्याचे अधिकारी अपघात सहायता निधी सदस्य तथा मुख्या लेखा अधिकारी यांना देण्यात आले आहे.वादविवाद टाळण्यासाठी दक्षताभविष्यात उद्भवणारे संभाव्य वादविवाद टाळण्याची दक्षताही महामंडळाने घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रात वारस नमूद नसल्यास अर्जदाराकडून तसे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले जाणार आहे. एकापेक्षा अधिक वारस असल्यासह आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस