शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

‘एसटी’तील कोरोना बळींसाठी अपघात सहायता निधी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 21:15 IST

‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे.

ठळक मुद्देकर्तव्य बजावताना गमावला जीव

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘कोविड-१९’चे बळी ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने अपघात सहायता निधी खुला करून दिला आहे. विमा कवच असलेल्या दिवंगत एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला या निधीतून ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून कुटुुंबाच्या बँक खात्यात ही रक्कम टाकली जाणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही लोकवाहिनी लोकांच्या सेवत होती. ही सेवा देताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. या कर्मचाºयांना विम्याचे कवच पुरविण्यात आले. मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. महामंडळातील १४४६ अधिकारी, कर्मचारी कोरोनाग्रस्त झाले. यातील ८९० जण बरे झाले आहे. मात्र उपचार घेत असताना ४४ जणांचा जीव गेला. सद्यस्थितीत ५९२ कर्मचारी कोरोनाग्रस्त आहे. त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार केले जात आहे.

दिवंगत कर्मचाºयांना विम्याचे कवच असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ठरल्यानुसार ५० लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. यासाठी लागणाºया रकमेची तरतुदही महामंडळाला करावी लागली. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकीटावर अपघात सहायता निधी कपात केला जातो. या निधीचा उपयोग बस अपघातात ठार झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी केला जातो. चार वर्षांपासून हा निधी गोळा केला जातो. यातूनच काही रक्कम खर्च झाली आहे. या निधीचे काही महिन्यापर्यंत २०० कोटी महामंडळाकडे जमा होते.

या जमा रकमेतून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य दिले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या अपघात सहायता निधी विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली आहे. ५० लाखांची पूर्तता करण्यासाठी लागणारा निधी अपघात सहायता निधी विश्वस्त मंडळाकडून विभागाच्या मागणीनुसार वर्ग करण्याचे अधिकारी अपघात सहायता निधी सदस्य तथा मुख्या लेखा अधिकारी यांना देण्यात आले आहे.वादविवाद टाळण्यासाठी दक्षताभविष्यात उद्भवणारे संभाव्य वादविवाद टाळण्याची दक्षताही महामंडळाने घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी विवरणपत्रात वारस नमूद नसल्यास अर्जदाराकडून तसे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले जाणार आहे. एकापेक्षा अधिक वारस असल्यासह आवश्यक ती कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस