शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
7
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
8
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' मुंबई IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
9
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
10
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
11
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
12
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
13
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
14
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
15
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
16
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
17
रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून २० वर्षीय तरुणीचा मृत्यू!
18
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
19
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...

औटघटकेची फौजदारी दहा दिवसात संपुष्टात येणार

By admin | Updated: November 9, 2014 22:35 IST

राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला

यवतमाळ : राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला असून दहा दिवसांनी त्यांची फौजदारी संपुष्टात येणार आहे. कर्मचाऱ्याचे फौजदार झालेल्या ४० जणांना पुन्हा आपल्या पूर्वपदावर कर्तव्य बजावावे लागणार असल्याने त्यांना चुटपूट लागली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अधिकाऱ्यांची उणिव भासू नये म्हणून गृह विभागाने एका आदेशान्वये सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी फौजदारी बहाल करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आटोपताच आपल्याला पूर्वपदावर कर्तव्य बजावावे लागेल, असेही आदेशात नमूद होते. पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच अनेकांची फौजदार होण्याची सुप्त इच्छा असते. मात्र पदोन्नतीने थेट फौजदारकी मिळविणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा अपूर्ण राहते. गृह विभागाने काढलेल्या या आदेशाने औटघटकेचे का होई ना आपल्याला फौजदार होता येईल, या अपेक्षेने जिल्हा पोलीस दलातील अनेकांनी फौजदारीसाठी अर्ज केले होते. त्यातील निवडक ४० जणांना सेवाज्येष्ठतेनुसार निवडणुकीपूर्वी फौजदारी देण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या वेतनावरच संबंधित कर्मचाऱ्यांना ही फौजदारी देण्यात आली. आता निवडणूक आटोपून फौजदारीचा कालावधीही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. येत्या २३ नोव्हेंबरला हा कालावधी संपत आहे. १० दिवसांनी फौजदारकी जाणार या भीतीने अनेकांना ग्रासले आहे. गृह विभागाने एखादा नवा पर्याय शोधून सेवाज्येष्ठांना फौजदारपदी कायम करावे, अशी अपेक्षा त्यांना असली तरी ते काही शक्य नाही. त्यामुळे अनेकांना चुटपूट लागली आहे. अनेकांनी तर फौजदाराच्या वर्दीतील फोटो आठवण म्हणून काढून ठेवले आहे. त्यांचा आता पुरता हिरमोड होणार असल्याचेही सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)