शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

औटघटकेची फौजदारी दहा दिवसात संपुष्टात येणार

By admin | Updated: November 9, 2014 22:35 IST

राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला

यवतमाळ : राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला असून दहा दिवसांनी त्यांची फौजदारी संपुष्टात येणार आहे. कर्मचाऱ्याचे फौजदार झालेल्या ४० जणांना पुन्हा आपल्या पूर्वपदावर कर्तव्य बजावावे लागणार असल्याने त्यांना चुटपूट लागली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अधिकाऱ्यांची उणिव भासू नये म्हणून गृह विभागाने एका आदेशान्वये सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी फौजदारी बहाल करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आटोपताच आपल्याला पूर्वपदावर कर्तव्य बजावावे लागेल, असेही आदेशात नमूद होते. पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच अनेकांची फौजदार होण्याची सुप्त इच्छा असते. मात्र पदोन्नतीने थेट फौजदारकी मिळविणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा अपूर्ण राहते. गृह विभागाने काढलेल्या या आदेशाने औटघटकेचे का होई ना आपल्याला फौजदार होता येईल, या अपेक्षेने जिल्हा पोलीस दलातील अनेकांनी फौजदारीसाठी अर्ज केले होते. त्यातील निवडक ४० जणांना सेवाज्येष्ठतेनुसार निवडणुकीपूर्वी फौजदारी देण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या वेतनावरच संबंधित कर्मचाऱ्यांना ही फौजदारी देण्यात आली. आता निवडणूक आटोपून फौजदारीचा कालावधीही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. येत्या २३ नोव्हेंबरला हा कालावधी संपत आहे. १० दिवसांनी फौजदारकी जाणार या भीतीने अनेकांना ग्रासले आहे. गृह विभागाने एखादा नवा पर्याय शोधून सेवाज्येष्ठांना फौजदारपदी कायम करावे, अशी अपेक्षा त्यांना असली तरी ते काही शक्य नाही. त्यामुळे अनेकांना चुटपूट लागली आहे. अनेकांनी तर फौजदाराच्या वर्दीतील फोटो आठवण म्हणून काढून ठेवले आहे. त्यांचा आता पुरता हिरमोड होणार असल्याचेही सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)