शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

औटघटकेची फौजदारी दहा दिवसात संपुष्टात येणार

By admin | Updated: November 9, 2014 22:35 IST

राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला

यवतमाळ : राज्याच्या पोलीस खात्यात फौजदारांची शेकडो पदे रिक्त होती. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना औटघटकेची बढती देण्यात आली. आता हा कालावधी संपत आला असून दहा दिवसांनी त्यांची फौजदारी संपुष्टात येणार आहे. कर्मचाऱ्याचे फौजदार झालेल्या ४० जणांना पुन्हा आपल्या पूर्वपदावर कर्तव्य बजावावे लागणार असल्याने त्यांना चुटपूट लागली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अधिकाऱ्यांची उणिव भासू नये म्हणून गृह विभागाने एका आदेशान्वये सेवाज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांसाठी फौजदारी बहाल करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणूक आटोपताच आपल्याला पूर्वपदावर कर्तव्य बजावावे लागेल, असेही आदेशात नमूद होते. पोलीस खात्यात दाखल झाल्यापासूनच अनेकांची फौजदार होण्याची सुप्त इच्छा असते. मात्र पदोन्नतीने थेट फौजदारकी मिळविणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा अपूर्ण राहते. गृह विभागाने काढलेल्या या आदेशाने औटघटकेचे का होई ना आपल्याला फौजदार होता येईल, या अपेक्षेने जिल्हा पोलीस दलातील अनेकांनी फौजदारीसाठी अर्ज केले होते. त्यातील निवडक ४० जणांना सेवाज्येष्ठतेनुसार निवडणुकीपूर्वी फौजदारी देण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या वेतनावरच संबंधित कर्मचाऱ्यांना ही फौजदारी देण्यात आली. आता निवडणूक आटोपून फौजदारीचा कालावधीही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. येत्या २३ नोव्हेंबरला हा कालावधी संपत आहे. १० दिवसांनी फौजदारकी जाणार या भीतीने अनेकांना ग्रासले आहे. गृह विभागाने एखादा नवा पर्याय शोधून सेवाज्येष्ठांना फौजदारपदी कायम करावे, अशी अपेक्षा त्यांना असली तरी ते काही शक्य नाही. त्यामुळे अनेकांना चुटपूट लागली आहे. अनेकांनी तर फौजदाराच्या वर्दीतील फोटो आठवण म्हणून काढून ठेवले आहे. त्यांचा आता पुरता हिरमोड होणार असल्याचेही सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)