शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 19:15 IST

Yawatmal News टिपेश्वर अभयारण्यात शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात वाघ अडकला. त्याने जाळे तोडून पळ काढला तरी त्याची तार गळ्यात अडकल्याने तो जखमी झाला आहे.

ठळक मुद्देजखमी अवस्थेतच भटकंतीअमरावतीच्या बचाव पथकाकडून शोध

यवतमाळ : तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या तारांच्या जाळ्यात एक वाघ अडकला. मात्र, त्या वाघाने ते जाळे तोडून पळ काढला; पण या संघर्षात त्या वाघाच्या गळ्यात जाळ्याची तार अडकल्याने तो जखमी झाला आहे. गळ्यात अडकलेली ती तार घेऊनच हा वाघ जखमी अवस्थेत अभयारण्यात फिरत आहे.

या जखमी वाघाच्या गळ्यातील तारांचा फास काढण्यासाठी अमरावती येथील बचाव पथक सुमारे आठ दिवसांपासून या अभयारण्यात गस्त घालत आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वन्य प्राण्यांची नेहमीच शिकार करण्यात येते. अभयारण्य प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सातत्याने शिकारीच्या घटना घडत आहेत. वन्य प्राण्यांची शिकार करून त्यावर ताव मारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या आठ दिवसांआधी एका पर्यटकाला अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात तार अडकल्याचे दिसून आले. याची माहिती टिपेश्वरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. अभयारण्यात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्येसुद्धा एका वाघाच्या गळ्यात तार अडकल्याचे दिसून आल्याची माहिती आहे. टिपेश्वरच्या पाटणबोरी रेजंमधील एदलापूर व पिलखान बिटमध्ये हा जखमी वाघ आढळून आला होता. त्याचा वावरदेखील या दोन बिटांतच आहे. परंतु, अद्यापही बचाव पथकाच्या हाती लागत नाही आहे.

टिपेश्वर अभयारण्य किंवा लगतच्या शेत शिवारात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे लावण्यात येते. अशाच एका तारांच्या जाळ्यात तो वाघ अडकला. याबाबत माहिती मिळताच, अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या. १७ मार्च २०१९ रोजी तार गळ्यात अडकलेल्या टी-४ या जखमी वाघिणीला बेशुद्ध करण्याकरिता ट्रँक्युलाईझ गणद्वारे डॉट मारण्यात आला होता. परंतु, ती बेशुद्ध होण्याआधीच तिला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्या वाघिणीने आश्विन बाकमवार व इरफान शेख या दोन मजुरांवर हल्ला केला होता. यावेळी त्यांना वाचविण्याकरिता झालेल्या झटापटीत वाघिणीचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी बोलले जात होते. राजकीय दबावापोटी त्याची चौकशीसुद्धा त्यावेळी थंडबस्त्यात ठेवण्यात आली होती.

टिपेश्वरमधील वाघाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर वाघ असल्याबाबत बातम्यांद्वारे प्रसार व प्रचार होत आहे. यातून वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अन्न साखळीत शेवटच्या टोकावर असलेला वाघ आणि तृणभक्षक डुकर, रोही, हरीण यांचीही संख्या वाढत असल्याने जंगल भागात शेती करणे कठीण झाले आहे.

टॅग्स :Tigerवाघ