शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

टिपेश्वर अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 19:15 IST

Yawatmal News टिपेश्वर अभयारण्यात शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जाळ्यात वाघ अडकला. त्याने जाळे तोडून पळ काढला तरी त्याची तार गळ्यात अडकल्याने तो जखमी झाला आहे.

ठळक मुद्देजखमी अवस्थेतच भटकंतीअमरावतीच्या बचाव पथकाकडून शोध

यवतमाळ : तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेल्या तारांच्या जाळ्यात एक वाघ अडकला. मात्र, त्या वाघाने ते जाळे तोडून पळ काढला; पण या संघर्षात त्या वाघाच्या गळ्यात जाळ्याची तार अडकल्याने तो जखमी झाला आहे. गळ्यात अडकलेली ती तार घेऊनच हा वाघ जखमी अवस्थेत अभयारण्यात फिरत आहे.

या जखमी वाघाच्या गळ्यातील तारांचा फास काढण्यासाठी अमरावती येथील बचाव पथक सुमारे आठ दिवसांपासून या अभयारण्यात गस्त घालत आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वन्य प्राण्यांची नेहमीच शिकार करण्यात येते. अभयारण्य प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सातत्याने शिकारीच्या घटना घडत आहेत. वन्य प्राण्यांची शिकार करून त्यावर ताव मारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या आठ दिवसांआधी एका पर्यटकाला अभयारण्यातील वाघाच्या गळ्यात तार अडकल्याचे दिसून आले. याची माहिती टिपेश्वरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. अभयारण्यात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्येसुद्धा एका वाघाच्या गळ्यात तार अडकल्याचे दिसून आल्याची माहिती आहे. टिपेश्वरच्या पाटणबोरी रेजंमधील एदलापूर व पिलखान बिटमध्ये हा जखमी वाघ आढळून आला होता. त्याचा वावरदेखील या दोन बिटांतच आहे. परंतु, अद्यापही बचाव पथकाच्या हाती लागत नाही आहे.

टिपेश्वर अभयारण्य किंवा लगतच्या शेत शिवारात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे लावण्यात येते. अशाच एका तारांच्या जाळ्यात तो वाघ अडकला. याबाबत माहिती मिळताच, अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या. १७ मार्च २०१९ रोजी तार गळ्यात अडकलेल्या टी-४ या जखमी वाघिणीला बेशुद्ध करण्याकरिता ट्रँक्युलाईझ गणद्वारे डॉट मारण्यात आला होता. परंतु, ती बेशुद्ध होण्याआधीच तिला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने त्या वाघिणीने आश्विन बाकमवार व इरफान शेख या दोन मजुरांवर हल्ला केला होता. यावेळी त्यांना वाचविण्याकरिता झालेल्या झटापटीत वाघिणीचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी बोलले जात होते. राजकीय दबावापोटी त्याची चौकशीसुद्धा त्यावेळी थंडबस्त्यात ठेवण्यात आली होती.

टिपेश्वरमधील वाघाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर वाघ असल्याबाबत बातम्यांद्वारे प्रसार व प्रचार होत आहे. यातून वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अन्न साखळीत शेवटच्या टोकावर असलेला वाघ आणि तृणभक्षक डुकर, रोही, हरीण यांचीही संख्या वाढत असल्याने जंगल भागात शेती करणे कठीण झाले आहे.

टॅग्स :Tigerवाघ