शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

नापिकीने त्रस्त दाम्पत्याने संपवली जीवन यात्रा

By सुरेंद्र राऊत | Updated: April 14, 2024 20:38 IST

मक्त्याची शेती आली अंगलट : सकाळी घरून गेले दुपारी विहिरीत आढळले मृतदेह

आर्णी (यवतमाळ) : भुमिहीन शेतमजूर दाम्पत्याने गावातील काही शेती मक्त्याने (ठेक्याने) केली हाेती. सतत प्रयत्न करूनही शेतात प्रचंड नापिकी झाली. त्यात शेतमालाचे भाव पडले, यातून आर्थिक अडचणीत आलेल्या शेमजूर दाम्पत्यावर कर्जाची डाेंगर वाढतच गेला. त्यात विवाहित मुलीची सिझर प्रसुती करावी लागली. याचा खर्चाचा ताळमेळ बसविता प्रचंड नैराश्य आल्याने दाम्पत्याने दाेन मुली व एक मुलाला मागे ठेवून जगाचा निराेप घेतला. दाेघेही रविवारी सकाळी ७ वजाता मक्त्याच्या शेतात गेले. तेथे त्यांनी विहिरी उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना आर्णी तालुक्यातील डेहणी रविवारी दुपारी १२ वाजता उघड झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

किशोर बाळकृष्ण नाटकर (४५), वनिता किशोर नाटकर (४०) दाेघेही रा. डेहणी असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. किशाेर व वनिता दाेघेही प्रचंड मेहनती हाेते. दरवर्षी ते गावातील शेतकऱ्यांची जमिन मक्त्याने करत हाेते. काही दिवस त्यांनी शेतातून चांगले उत्पन्न काढले. मात्र मागील वर्षी त्यांना शेतात प्रचंड नुकसान झाले. निर्सगाचा लहरीपणा, पडलेले शेतमालाचे भाव यामुळे मक्त्याच्या शेतीतून त्यांना मजूरीचेही पैसे मिळाले नाही. अशातच माेठ्या मुलीची प्रसुती करण्याची जबाबदारी आली. तिच्यावर माेठा खर्च झाला. घरात दुसरी लग्नाची मुलगी आहे, पाेरगाही वयात आला. अशा स्थितीत आपण कर्जदाराचे देणे कसे चुकवायचे काैटुंबिक जबाबदारी कशी पूर्ण करायची हा प्रश्न नाटकर दाम्पत्याला सतावू लागला. याच विवंचनेत दाेघेही रविवारी सकाळी घराबाहेर पडले. शेतमालक वामन माधव दिघळकर यांच्या शेतातील विहिरीत त्यांनी उडी घेतली. याच शेतातून दुपारी जात असलेल्या एकाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने याची माहिती गावात दिली. संपूर्ण गाव शेतातील विहिरीजवळ गाेळा झाला. आर्णी पाेलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. दाेघांचेही मृतदेह विहिरी बाहेर काढून शविचिकित्सेसाठी आर्णी ग्रामीण रूग्णालयता आणले.

या प्रकरणी श्रीकांत चिदकाजी नाटकर याच्या तक्रारीवरून पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद घेतली आहे. घटनेचा अधिक तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जमादार अशाेक टेकाळे व मुनेश्वर करत आहे.