शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

पोलिसांविरोधात खटला भोवला; याचिकाकर्त्याला एक लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 22:33 IST

पोलीस कारवाईविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात एफआयआर रद्दची याचिका दाखल केली. नंतर याच प्रकरणात रिट पिटीशन करून कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दहा लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा दावा आरोपीने केला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा दावा व याचिका फेटाळून लावत आरोपी पोलिसांवर दबाव आणत असल्याचे निष्कर्ष नोंदविले. न्यायालयाने आरोपीला या प्रकरणात एक लाखाचा दंड ठोठावला. 

सुरेंद्र राऊत लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दगडी कोळसा चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी भादंवितील कलम ३७९, ३४ नुसार गुन्हे दाखल केले. या पोलीस कारवाईविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात एफआयआर रद्दची याचिका दाखल केली. नंतर याच प्रकरणात रिट पिटीशन करून कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दहा लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा दावा आरोपीने केला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा दावा व याचिका फेटाळून लावत आरोपी पोलिसांवर दबाव आणत असल्याचे निष्कर्ष नोंदविले. न्यायालयाने आरोपीला या प्रकरणात एक लाखाचा दंड ठोठावला. यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत २०२१ मध्ये कोळसा चोरीचा गुन्हा दाखल झाला. यात फिर्यादी जमादार हरिभाऊ सुरपाम हे होते. त्यावरून इर्शाद खान इकबाल खान (रा. साईनगर, वणी) याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात आरोपी इर्शाद खानने वणी न्यायालयात एफआयआर रद्दसाठी याचिका दाखल केली. हे प्रकरण सुरू असतानाच आरोपीने उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे धाव घेतली. त्याने न्यायालयापुढे याचिका सादर करताना पोलिसांची कारवाई आकसपूर्ण असल्याचे नमूद केले. तसेच तपास अधिकारी व तक्रारदार पोलीस यांच्याकडून प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, असा दावा केला. या संदर्भात न्या. रोहित देव आणि अनिल पानसरे यांच्या बेंचपुढे सुनावणी झाली. आरोपीची फौजदारी रिट पिटीशन फेटाळून लावत आरोपीकडून लोकसेवकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो, असे मत न्यायालयाने नोंदविले. आदेश होताच १५ दिवसांच्या आत याचिकाकर्ता आरोपी इर्शाद इकबाल खान याने एक लाख रुपये रक्कम रजिस्ट्रीद्वारे पोलीस कल्याण निधीत हस्तांतरित करण्याचा आदेश दिला. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते.  न्यायालयाच्या या आदेशामुळे याचिकेच्या माध्यमातून तपास यंत्रणेवर दबाव टाकणाऱ्यांना चपराक बसली आहे. अन्यायपूर्ण कारवाई असल्यास न्यायालयाकडून दिलासा दिला जातो. मात्र या प्रक्रियेचा आधार घेऊन स्वत:च्या सुटकेचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना शिक्षासुद्धा होते या निकालातून पुढे आले आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालयPoliceपोलिस