शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

सन्मानधन योजनेसाठी राज्यातील ९४ लाख शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:33 IST

सन्मानधन योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. लाभार्थी निवडीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यभरातील ९४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देराज्याला ५६४० कोटींचा वाटा औरंगाबाद विभागात मिळणार सर्वाधिक लाभ

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सन्मानधन योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. लाभार्थी निवडीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यभरातील ९४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. केंद्र शासनाला दरवर्षी राज्याकडे पाच हजार ६४० कोटी रूपये वळते करावे लागणार आहे. याचा सर्वाधिक लाभ औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांना होणार आहे.या योजनेत प्रारंभी छोटेच शेतकरी होते. आता मोठ्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला. या निकषा नुसार शेतकऱ्यांची निवड करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्यात एक कोटी ७९ लाख शेतकरी खातेधारक आहेत. त्यांच्याकडे एक कोटी ४७ लाख हेक्टर शेतजमीन आहे. यातील ८५ लाख शेतकरी अपात्र ठरले. ९४ लाख ५४ हजार २६४ शेतकऱ्यांना सन्मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्याचे काम जिल्हास्तरावर केले जात आहे. ९१ टक्के शेतकऱ्यांची नावे आॅनलाईन करण्यात आली आहे. दोन हजार रूपये मदतीचा पहिला टप्पा राज्याकडे वळता झाला आहे. दुसरा टप्पा वळता व्हायचा आहे.औरंगाबाद विभागात ४७ लाख ५३ हजार ८२० शेतकरी खातेधारक आहेत. यातील २४ लाख ५२ हजार ३३६ शेतकरी योजनेत पात्र ठरले आहे. इतर विभागाच्या तुलनेत औरंगाबाद विभागातील पात्र शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. तर सर्वात कमी लाभार्थी कोकण विभागातील आहे. या विभागात २१ लाख २५ हजार ९३३खातेधारक आहेत. यातील सहा लाख ४० हजार ९४६ शेतकरी खातेधारक पात्र ठरले आहेत.असे आहेत जिल्हानिहाय पात्र शेतकरीपालघर एक लाख ७ हजार, रत्नागिरी दोन लाख दोन हजार, रायगड एक लाख २१ हजार, सिंधुदुर्ग एक लाख २७ हजार, ठाणे ८३ हजार ४३३, सातारा चार लाख ५८ हजार, पुणे चार लाख एक हजार, सोलापूर पाच लाख ७४ हजार, कोल्हापूर ४ लाख ३० हजार, सांगली तीन लाख ९५ हजार, अहमदनगर सहा लाख ५८ हजार, जळगाव चार लाख ५१ हजार, नाशिक चार लाख ५४ हजार, धुळे दोन लाख ३६ हजार, नंदुरबार एक लाख २९ हजार, औरंगाबाद तीन लाख सात हजार, नांदेड तीन लाख ९१ हजार, जालना दोन लाख ९० हजार, परभणी दोन लाख ६८ हजार, बिड चार लाख एक हजार, उसमानाबाद दोन लाख ४८ हजार, हिंगोली दोन लाख नऊ हजार, लातूर तीन लाख ३३ हजार, बुलडाणा तीन लाख ३५ हजार, वाशिम एक लाख ५६ हजार, यवतमाळ दोन लाख ७५ हजार, अमरावती दोन लाख ८४ हजार, अकोला एक लाख ७५ हजार, नागपूर एक लाख ७३ हजार, वर्धा एक लाख ३६ हजार, भंडारा एक लाख ५४ हजार, गांदिया एक लाख ७४ हजार, चंद्रपूर दोन लाख नऊ हजार, गडचिरोली एक लाख २३ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.८५ लाख शेतकरी अपात्रशासकीय नोकरी आणि राजकीय पदावर असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी न करण्याच्या सूचना आहेत. यानुसार राज्यातील ८५ लाख दोन हजार ८०९ शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील सर्वाधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी