शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

सन्मानधन योजनेसाठी राज्यातील ९४ लाख शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 14:33 IST

सन्मानधन योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. लाभार्थी निवडीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यभरातील ९४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देराज्याला ५६४० कोटींचा वाटा औरंगाबाद विभागात मिळणार सर्वाधिक लाभ

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सन्मानधन योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जाणार आहे. लाभार्थी निवडीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. राज्यभरातील ९४ लाख शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. केंद्र शासनाला दरवर्षी राज्याकडे पाच हजार ६४० कोटी रूपये वळते करावे लागणार आहे. याचा सर्वाधिक लाभ औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांना होणार आहे.या योजनेत प्रारंभी छोटेच शेतकरी होते. आता मोठ्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला. या निकषा नुसार शेतकऱ्यांची निवड करून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्यात एक कोटी ७९ लाख शेतकरी खातेधारक आहेत. त्यांच्याकडे एक कोटी ४७ लाख हेक्टर शेतजमीन आहे. यातील ८५ लाख शेतकरी अपात्र ठरले. ९४ लाख ५४ हजार २६४ शेतकऱ्यांना सन्मानधन योजनेचा लाभ मिळणार आहे. या शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्याचे काम जिल्हास्तरावर केले जात आहे. ९१ टक्के शेतकऱ्यांची नावे आॅनलाईन करण्यात आली आहे. दोन हजार रूपये मदतीचा पहिला टप्पा राज्याकडे वळता झाला आहे. दुसरा टप्पा वळता व्हायचा आहे.औरंगाबाद विभागात ४७ लाख ५३ हजार ८२० शेतकरी खातेधारक आहेत. यातील २४ लाख ५२ हजार ३३६ शेतकरी योजनेत पात्र ठरले आहे. इतर विभागाच्या तुलनेत औरंगाबाद विभागातील पात्र शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे. तर सर्वात कमी लाभार्थी कोकण विभागातील आहे. या विभागात २१ लाख २५ हजार ९३३खातेधारक आहेत. यातील सहा लाख ४० हजार ९४६ शेतकरी खातेधारक पात्र ठरले आहेत.असे आहेत जिल्हानिहाय पात्र शेतकरीपालघर एक लाख ७ हजार, रत्नागिरी दोन लाख दोन हजार, रायगड एक लाख २१ हजार, सिंधुदुर्ग एक लाख २७ हजार, ठाणे ८३ हजार ४३३, सातारा चार लाख ५८ हजार, पुणे चार लाख एक हजार, सोलापूर पाच लाख ७४ हजार, कोल्हापूर ४ लाख ३० हजार, सांगली तीन लाख ९५ हजार, अहमदनगर सहा लाख ५८ हजार, जळगाव चार लाख ५१ हजार, नाशिक चार लाख ५४ हजार, धुळे दोन लाख ३६ हजार, नंदुरबार एक लाख २९ हजार, औरंगाबाद तीन लाख सात हजार, नांदेड तीन लाख ९१ हजार, जालना दोन लाख ९० हजार, परभणी दोन लाख ६८ हजार, बिड चार लाख एक हजार, उसमानाबाद दोन लाख ४८ हजार, हिंगोली दोन लाख नऊ हजार, लातूर तीन लाख ३३ हजार, बुलडाणा तीन लाख ३५ हजार, वाशिम एक लाख ५६ हजार, यवतमाळ दोन लाख ७५ हजार, अमरावती दोन लाख ८४ हजार, अकोला एक लाख ७५ हजार, नागपूर एक लाख ७३ हजार, वर्धा एक लाख ३६ हजार, भंडारा एक लाख ५४ हजार, गांदिया एक लाख ७४ हजार, चंद्रपूर दोन लाख नऊ हजार, गडचिरोली एक लाख २३ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.८५ लाख शेतकरी अपात्रशासकीय नोकरी आणि राजकीय पदावर असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी न करण्याच्या सूचना आहेत. यानुसार राज्यातील ८५ लाख दोन हजार ८०९ शेतकरी मदतीस अपात्र ठरले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील सर्वाधिक शेतकरी अपात्र ठरले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी