शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा रोखण्याची जबाबदारी ९० कीटकनाशक कंपन्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:44 IST

अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देकृषी आयुक्तांचे आदेश २८ हजार गावात प्रबोधन करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. दोन हजार शेतकरी, शेतमजूर बाधित झाले. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे. या कंपन्या राज्यातील २८ हजार गावात प्रबोधन करणार आहे. राज्यातील ९० कंपन्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सन २०१७-२०१८ मध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेने २२ मृत्यू झाले. बाधित दोन हजार शेतकरी आणि शेतमजूरातील ८३९ शेतकरी-शेतमजूर यवतमाळ जिल्ह्यातील होते. आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे अनेकांचे प्राण वाचले. यानंतर कृषी विभागाने अनेक औषधांवर बंदी घातली. विषबाधा व मृत्यू रोखण्यासाठी गेल्या वर्षी कृषी खात्याने व्यापक उपाययोजना केल्या होत्या. कीटकनाशक कंपन्यांनाही त्यात सहभागी करून घेण्यात आले. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांना कीट देण्यात आल्या. मात्र त्यानंतरही सन २०१८-२०१९ मध्ये ३३५ शेतकरी आणि शेतमजूर बाधित झाले. राज्यात सहा शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. त्यापासून धडा घेत आता विषबाधा होऊच नये यासाठी कृषी आयुक्तालयाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरू केल्या. आता थेट कीटकनाशक कंपन्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक कंपनीला गावपातळीवर काम करावे लागणार आहे. त्याकरिता एक साजा निश्चित केला जाणार आहे.फवारणी करताना कुठली खबरदारी घ्यावी, कुठल्या उपाययोजना कराव्या, संरक्षण किटचा कसा वापर करावा, अतिजहाल औषधी कशी ओळखावी याची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना सुरक्षा किटही वितरित कराव्या लागणार आहे. कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावे, गावसभा, मासिक चर्चासत्र, कार्यशाळा, पथनाट्य या माध्यमातून जाणीव जागृती करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहे.बोंडअळीने नुकसान टाळण्यासाठी रथफेरीगुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बियाणे कंपनीला गावापर्यंत रथफेरी न्यावी लागणार आहेत. यात ट्रायकोकार्ड, फेरोमन ट्रॅप, प्रकाश सापळे याविषयीची माहिती दिली जाणार आहे. या वस्तू शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बियाणे कंपनीवर आहे. यासंपूर्ण प्रक्रियेत काय बदल घडतात यावर पुढील उपाययोजना विसंबून राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेती