शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

विषबाधा रोखण्याची जबाबदारी ९० कीटकनाशक कंपन्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:44 IST

अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देकृषी आयुक्तांचे आदेश २८ हजार गावात प्रबोधन करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. दोन हजार शेतकरी, शेतमजूर बाधित झाले. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे. या कंपन्या राज्यातील २८ हजार गावात प्रबोधन करणार आहे. राज्यातील ९० कंपन्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सन २०१७-२०१८ मध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेने २२ मृत्यू झाले. बाधित दोन हजार शेतकरी आणि शेतमजूरातील ८३९ शेतकरी-शेतमजूर यवतमाळ जिल्ह्यातील होते. आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे अनेकांचे प्राण वाचले. यानंतर कृषी विभागाने अनेक औषधांवर बंदी घातली. विषबाधा व मृत्यू रोखण्यासाठी गेल्या वर्षी कृषी खात्याने व्यापक उपाययोजना केल्या होत्या. कीटकनाशक कंपन्यांनाही त्यात सहभागी करून घेण्यात आले. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांना कीट देण्यात आल्या. मात्र त्यानंतरही सन २०१८-२०१९ मध्ये ३३५ शेतकरी आणि शेतमजूर बाधित झाले. राज्यात सहा शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. त्यापासून धडा घेत आता विषबाधा होऊच नये यासाठी कृषी आयुक्तालयाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरू केल्या. आता थेट कीटकनाशक कंपन्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक कंपनीला गावपातळीवर काम करावे लागणार आहे. त्याकरिता एक साजा निश्चित केला जाणार आहे.फवारणी करताना कुठली खबरदारी घ्यावी, कुठल्या उपाययोजना कराव्या, संरक्षण किटचा कसा वापर करावा, अतिजहाल औषधी कशी ओळखावी याची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना सुरक्षा किटही वितरित कराव्या लागणार आहे. कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावे, गावसभा, मासिक चर्चासत्र, कार्यशाळा, पथनाट्य या माध्यमातून जाणीव जागृती करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहे.बोंडअळीने नुकसान टाळण्यासाठी रथफेरीगुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बियाणे कंपनीला गावापर्यंत रथफेरी न्यावी लागणार आहेत. यात ट्रायकोकार्ड, फेरोमन ट्रॅप, प्रकाश सापळे याविषयीची माहिती दिली जाणार आहे. या वस्तू शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बियाणे कंपनीवर आहे. यासंपूर्ण प्रक्रियेत काय बदल घडतात यावर पुढील उपाययोजना विसंबून राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेती