शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

विषबाधा रोखण्याची जबाबदारी ९० कीटकनाशक कंपन्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:44 IST

अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देकृषी आयुक्तांचे आदेश २८ हजार गावात प्रबोधन करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. दोन हजार शेतकरी, शेतमजूर बाधित झाले. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे. या कंपन्या राज्यातील २८ हजार गावात प्रबोधन करणार आहे. राज्यातील ९० कंपन्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सन २०१७-२०१८ मध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेने २२ मृत्यू झाले. बाधित दोन हजार शेतकरी आणि शेतमजूरातील ८३९ शेतकरी-शेतमजूर यवतमाळ जिल्ह्यातील होते. आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे अनेकांचे प्राण वाचले. यानंतर कृषी विभागाने अनेक औषधांवर बंदी घातली. विषबाधा व मृत्यू रोखण्यासाठी गेल्या वर्षी कृषी खात्याने व्यापक उपाययोजना केल्या होत्या. कीटकनाशक कंपन्यांनाही त्यात सहभागी करून घेण्यात आले. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांना कीट देण्यात आल्या. मात्र त्यानंतरही सन २०१८-२०१९ मध्ये ३३५ शेतकरी आणि शेतमजूर बाधित झाले. राज्यात सहा शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. त्यापासून धडा घेत आता विषबाधा होऊच नये यासाठी कृषी आयुक्तालयाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरू केल्या. आता थेट कीटकनाशक कंपन्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक कंपनीला गावपातळीवर काम करावे लागणार आहे. त्याकरिता एक साजा निश्चित केला जाणार आहे.फवारणी करताना कुठली खबरदारी घ्यावी, कुठल्या उपाययोजना कराव्या, संरक्षण किटचा कसा वापर करावा, अतिजहाल औषधी कशी ओळखावी याची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना सुरक्षा किटही वितरित कराव्या लागणार आहे. कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावे, गावसभा, मासिक चर्चासत्र, कार्यशाळा, पथनाट्य या माध्यमातून जाणीव जागृती करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहे.बोंडअळीने नुकसान टाळण्यासाठी रथफेरीगुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बियाणे कंपनीला गावापर्यंत रथफेरी न्यावी लागणार आहेत. यात ट्रायकोकार्ड, फेरोमन ट्रॅप, प्रकाश सापळे याविषयीची माहिती दिली जाणार आहे. या वस्तू शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बियाणे कंपनीवर आहे. यासंपूर्ण प्रक्रियेत काय बदल घडतात यावर पुढील उपाययोजना विसंबून राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेती