शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

विषबाधा रोखण्याची जबाबदारी ९० कीटकनाशक कंपन्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 15:44 IST

अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देकृषी आयुक्तांचे आदेश २८ हजार गावात प्रबोधन करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अतिजहाल कीटकनाशकाची फवारणी करताना दोन वर्षांपूर्वी ४० शेतकऱ्यांचा बळी गेला. दोन हजार शेतकरी, शेतमजूर बाधित झाले. या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने कीटकनाशक कंपन्या आणि बियाणे कंपन्यावर जबाबदारी सोपविण्याचे आदेश दिले आहे. या कंपन्या राज्यातील २८ हजार गावात प्रबोधन करणार आहे. राज्यातील ९० कंपन्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सन २०१७-२०१८ मध्ये एकट्या यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेने २२ मृत्यू झाले. बाधित दोन हजार शेतकरी आणि शेतमजूरातील ८३९ शेतकरी-शेतमजूर यवतमाळ जिल्ह्यातील होते. आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे अनेकांचे प्राण वाचले. यानंतर कृषी विभागाने अनेक औषधांवर बंदी घातली. विषबाधा व मृत्यू रोखण्यासाठी गेल्या वर्षी कृषी खात्याने व्यापक उपाययोजना केल्या होत्या. कीटकनाशक कंपन्यांनाही त्यात सहभागी करून घेण्यात आले. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांना कीट देण्यात आल्या. मात्र त्यानंतरही सन २०१८-२०१९ मध्ये ३३५ शेतकरी आणि शेतमजूर बाधित झाले. राज्यात सहा शेतकऱ्यांचा विषबाधेने मृत्यू झाला. त्यापासून धडा घेत आता विषबाधा होऊच नये यासाठी कृषी आयुक्तालयाने युध्दपातळीवर उपाययोजना सुरू केल्या. आता थेट कीटकनाशक कंपन्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक कंपनीला गावपातळीवर काम करावे लागणार आहे. त्याकरिता एक साजा निश्चित केला जाणार आहे.फवारणी करताना कुठली खबरदारी घ्यावी, कुठल्या उपाययोजना कराव्या, संरक्षण किटचा कसा वापर करावा, अतिजहाल औषधी कशी ओळखावी याची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना सुरक्षा किटही वितरित कराव्या लागणार आहे. कृषी प्रदर्शन, शेतकरी मेळावे, गावसभा, मासिक चर्चासत्र, कार्यशाळा, पथनाट्य या माध्यमातून जाणीव जागृती करण्याच्या सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहे.बोंडअळीने नुकसान टाळण्यासाठी रथफेरीगुलाबी बोंडअळीने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बियाणे कंपनीला गावापर्यंत रथफेरी न्यावी लागणार आहेत. यात ट्रायकोकार्ड, फेरोमन ट्रॅप, प्रकाश सापळे याविषयीची माहिती दिली जाणार आहे. या वस्तू शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बियाणे कंपनीवर आहे. यासंपूर्ण प्रक्रियेत काय बदल घडतात यावर पुढील उपाययोजना विसंबून राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेती