शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी हवेत ९४ हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 11:01 IST

राज्यात बांधकामाधीन प्रकल्पांची किंमत आता ९४ हजार ४६३ कोटी रुपयांवर पोहोचली असून सिंचनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे.

ठळक मुद्दे३५९ प्रकल्प बांधकामाधीनअपूर्ण प्रकल्पांमुळे सिंचन रखडले

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात बांधकामाधीन प्रकल्पांची किंमत आता ९४ हजार ४६३ कोटी रुपयांवर पोहोचली असून सिंचनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे.राज्यात सिंचनाचे वांदे आहेत. त्यातही विदर्भाची अवस्था वाईट आहे. नवनवीन सिंचन प्रकल्पांची घोषणा होत असताना जुन्या रखडलेल्या प्रकल्पांकडे तेवढे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसते. निधीचा अभाव हे प्रमुख कारण यासाठी सांगितले जाते. प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी वाढत असल्याने बजेटही दरवर्षी कोट्यवधींनी वाढते आहे. आजच्या घडीला राज्यात ३५९ सिंचन प्रकल्प बांधकामाधीन आहेत. त्यासाठी १ एप्रिल २०१७ च्या उर्वरित किंमतीनुसार तब्बल ९४ हजार ४६३ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. आधीच कर्जात असलेल्या आणि शेतकरी कर्जमाफीमुळे आणखी आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी तत्काळ निधी उपलब्ध होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच हे ३५९ बांधकामाधीन प्रकल्प आणखी काही वर्षे असेच अर्धवट राहण्याची शक्यता आहे. पर्यायाने सिंचन क्षमता वाढ हे दिवास्वप्न ठरू शकते.

मध्यम व लघु प्रकल्पांची दुरावस्थाराज्यातील मोठ्याच नव्हे तर मध्यम व लघु प्रकल्पांचीही दुरावस्था आहे. गावे न उठल्याने प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत. त्यात पूर्ण क्षमतेने जलसंचय करता येत नाही. कुठे धरण आहे तर कालवे नाहीत आणि कालवे आहेत तर पाटसऱ्या नाहीत. कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षे वाढली आहेत, कालव्यांना तडे गेले आहेत. पाटसऱ्याही फुटल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत (टेल) सिंचनासाठी पाणी पोहोचत नाही.

शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न लांबणीवर९४ हजार कोटींच्या निधीची तरतूद सध्याची आर्थिक स्थिती पाहता राज्य शासनासाठी अशक्यप्राय वाटत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.

नदीजोड प्रकल्प २४ हजार कोटींचेराज्यात चार आंतरराज्य नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्याचे बजेट २४ हजार कोटींचे आहे. त्यात पार-तापी-नर्मदा, नार-पार-गिरणा, पार-गोदावरी, दमनगंगा पिंजाळ या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे १६०० दलघमी पाणीसाठा होणार असून त्यातून राज्याला एक लाख हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पांच्या सर्वेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. या प्रकल्पांच्या व्यवहार्यता तपासणीसाठी अभ्यास करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. या अनुषंगाने केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी ८ सप्टेंबर रोजी आढावा बैठकही पार पडली. त्यात प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीपैकी ९० टक्के निधी केंद्राकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Damधरण