शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

विहीर अधिग्रहणाचे ८८ प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: December 19, 2015 02:34 IST

तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होत असून गतवर्षी पाणी टंचाई विहीर अधिग्रहणाचे ८८ प्रस्ताव मंजुरीकरिता धूळ खात पडून आहे.

पाणीटंचाई : महागाव येथे कृती आराखड्याची खानापूर्ती महागाव : तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होत असून गतवर्षी पाणी टंचाई विहीर अधिग्रहणाचे ८८ प्रस्ताव मंजुरीकरिता धूळ खात पडून आहे. त्यामुळे नवीन विहीर अधिग्रहण होण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी महागाव तालुक्याला यंदा पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार आहे.महागाव पंचायत समितीत पाणीटंचाई आढावा बैठक ५ डिसेंबर रोजी घेण्यात आली. आमदार या बैठकीला उशिरा आल्याने बैठकीत पाणीटंचाईच्या विषयावर दीर्घ चर्चा झाली नाही. पाणीटंचाईच्या बैठकीत इतर विषयच जास्त हाताळण्यात आले. शिक्षण विभागाचा विषय सुरुवातीला घेण्यात आला. आरोग्य, बांधकाम, कृषी आणि बैठक संपताना पाणीटंचाईचा विषय घेण्यात आला. तोपर्यंत अनेक गावचे सरपंच बैठकीतून उठून गेले होते. त्यामुळे मुख्य विषय पाणीटंचाई कृती आराखड्याचा असतानाही त्यावर केवळ खानापूर्ती करण्यात आली. पाणीटंचाईच्या गावातील अनेक सरपंच पाणीटंचाईचा खास लेखाजोखा घेऊन आले होते. परंतु अनेक सरपंच उठून गेले. ११० गावांपैकी ३७ गावात पाणीटंचाईची झळ आतापासूनच जाणवत आहे. पर्जन्यमान कमी झाल्याचा फटका यावर्षी काळीदौला परिसरातील गावांना बसणार आहे. या भागातील किमान दहा गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. गुंज, काळी जिल्हा परिषद सर्कलमधील गावे माळपठार आहे. अशा गावात पाणीटंचाई लवकर जाणवू लागते. या भागातील विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव सर्वाधिक आले आहे. अधिग्रहणात दर्शविलेली काही गावे आणि एकाच गावातून चार ते सहा प्रस्ताव संशयास्पद असल्याने उपविभागीय अधिकारी दीपक सिंघला यांनी ते रोखून धरले आहे.यापूर्वी पंचायत समितीमधून अधिग्रहणाच्या नावाखाली पदाधिकाऱ्यांनी घरच्या विंधन विहिरी अधिग्रहणात दाखवून लाखो रुपये उचल केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे सिंघला यांनी ४० लाख रुपये वितरित करण्यापूर्वी अधिग्रहणातील अनेक त्रुट्या काढल्या होत्या. तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी संयुक्त पाणी करून विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना होत्या. पाणीटंचाईवर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीही गंभीर दिसत नाही. त्यामुळे अधिग्रहणातील कामांची पूर्तता अद्याप व्हायची आहे. गावागावात जाऊन पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी शासनाच्या सूचना आहे. त्याच प्रमाणे तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी वस्तुस्थिती माहीत करून घेणे अपेक्षित आहे. गावागावातील सरपंच पाणी टंचाईच्या कृती आराखड्यात गावाची नोंद करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात येत आहे. मात्र याची नोंद घेण्यास पंचायत समिती प्रशासन गंभीर दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)