शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

८७५ जागा, ८८ हजार अर्ज अन् आठ कोटींची कमाई; जिल्हा परिषदेची जम्बो भरती

By रवींद्र चांदेकर | Updated: September 8, 2023 19:30 IST

कंपनी मालामाल, बेरोजगारांचे हाल

यवतमाळ : राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या जम्बो भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेतही ८७५ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी ८८ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यातून परीक्षा घेणाऱ्या कंपनीला आठ कोटी रुपये मिळाले आहे.

जिल्हा परिषदेच्या ८७५ जागांसाठी २५ ऑगस्टपर्यंत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यात ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, परिचारिका, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यीकी, पंचायत, कृषी व शिक्षण विस्तार अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ लेखापाल, अकाऊंटंट, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, स्टेनोग्राफर, फिटर आदी पदांचा समावेश होता. एकूण ८७५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. विहित मर्यादेत तब्बल ८८ हजार ७५२ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहे. यात सर्वाधिक अर्ज ग्रामसेवक पदासाठी दाखल झाले आहे.

उमेदवारांनी अर्जासह शुल्कसुद्धा भरले. हजार रुपये आणि ९०० रुपये असे शुल्क ठेवण्यात आले होते. यातून भरती प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस कंपनीला आठ कोटी दोन लाख १७ हजार १०० रुपये प्राप्त झाले आहे. बेरोजगारांच्या शुल्कातून कंपनीच मालामाल झाल्याचे दिसून येत आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांपैकी अनेक उमेदवार बाहेरील जिल्ह्यातील असण्याची शक्यता आहे. या जागांसाठी संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संबंधित कंपनी भरती प्रक्रियेची पूर्ण अंमलबजावणी करणार आहे.अनेक वर्षानंतर जिल्हा परिषदेत जम्बो पदभरती होत असल्याने बेरोजगारांच्या नजरा या भरती प्रक्रियेकडे लागल्या आहेत. विविध ३१ पदांसाठी ही प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात सर्वाधिक ३७५ पदे आरोग्य सेवक महिलांची आहे. ग्रामसेवकांची १६१ तर आरोग्य सेवक पुरुषांची १०० पदे भरली जाणार आहे.

ग्रामसेवक पदासाठी ३२ हजार अर्ज

ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक ३२ हजार ३०६ अर्ज प्राप्त झाले आहे. आरोग्य सेवक पुरुष पदासाठी १८ हजार २३ तर हंगामी आरोग्य सेवक पदासाठी चार हजार १८ अर्ज दाखल झाले आहे. औषध निर्माण अधिकारी पदासाठी १७६४ अर्ज कंपनीला प्राप्त झाले आहे. ८८ हजार ७५२ अर्जांपैकी अनुसूचित जातीच्या उमेदवारांचे २० हजार ३१९, अनुसूचित जमाती उमेदवारांचे ११ हजार ६८७, व्हीजे (ए)चे ३०३१, एनटी (बी)चे २०७२, एनटी (सी)चे ३३९६, एनटी (डी)चे ३१५७ अर्ज प्राप्त झाले आहे. ओबीसी उमेदवारांचे सर्वाधिक अर्ज

८७५ जागांसाठी ओबीसी प्रवर्गातील तब्बल २६ हजार ४०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. विशेष मागास प्रवर्गातील ६८१ उमेदवारांनी तर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील नऊ हजार २०० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. याच जागांसाठी खुल्या प्रवर्गातील आठ हजार ८०७ उमेदवारांनीही अर्ज सादर केले आहे.

एका जागेसाठी १०१ दावेदार

जिल्हा परिषद ८७५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविणार आहे. त्यासाठी ८८ हजार ७५२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यामुळे सरासरी एका जागेसाठी तब्बल १०१ उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार आहे. प्रत्येक जागेसाठी उमेदवारांमध्ये काट्याची लढाई होणार आहे. यात सर्वाधिक गुण प्राप्त करून मुलाखतीसाठी पात्र ठरावे लागणार आहे. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतरच १०१ पैकी एकाच उमेदवाराला नोकरीची संधी मिळणार आहे.