शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

कोरोनाने ८५ तर इतर आजाराने ६५३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. तेथील रुग्णांची आकडेवारी व त्यांचा मृत्यू याचा लेखाजोखा तपासल्यास कोरोनाचा मृत्यूदर तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेण्याऐवजी योग्य खबरदारी घेऊन संसर्गाची लक्षणे वाटल्यास वेळेत उपचार घेण्याची गरज आहे. याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून विविध माध्यमातून केले जाते.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालय : मार्र्च ते आॅगस्टची स्थिती, कोरोनाचा मृत्यूदर कमीच, अवैध दारूचे सर्वाधिक रुग्ण

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातच नव्हे सर्वत्र कोरोना आजाराचा संसर्ग व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची चर्चा होत आहे. या स्थितीत इतर आजाराने, अपघात, विषबाधा, सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाच्या तुलनेत याचे प्रमाण किती तरी पटीने अधिक आहे. मार्च महिन्यापासून २६ आॅगस्टपर्यंत इतर आजाराने ६५३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहे. उपचारासाठी १८ हजार १९९ रूग्ण दाखल झाले. बाह्यरूग्ण तपासणी विभागातून एक लाख २७ हजार ४१३ रूग्णांनी तपासणी केली.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. तेथील रुग्णांची आकडेवारी व त्यांचा मृत्यू याचा लेखाजोखा तपासल्यास कोरोनाचा मृत्यूदर तुलनेत खूप कमी आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती घेण्याऐवजी योग्य खबरदारी घेऊन संसर्गाची लक्षणे वाटल्यास वेळेत उपचार घेण्याची गरज आहे. याचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून विविध माध्यमातून केले जाते. प्रत्यक्षात इतर आजार जिल्ह्यात धोकादायक ठरत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.दूषित पाणी, दारूने दुर्धर आजार जडतात. याचा परिणाम किडणी, लिव्हर या अवयवांवर होतो. ग्रामीण भागात विषारी दारूचे सेवन केले जाते. हातभट्टीची ही दारू अतिशय घातक ठरत आहे. त्यावर नियंत्रण नसल्याने सर्वाधिक रुग्ण याचे उपचारासाठी येतात. अशा व्यसनी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यावर कोणती उपाययोजना नाही. सर्वत्र खुलेआम हातभट्टी व अवैध दारू विक्री सुरू आहे. अपघातात मरणाºयाचेही प्रमाण अधिक आहेत. आता फवारणीचा कालावधी असल्याने विषबाधा झालेले रुग्ण येत आहेत. शेतात काम करताना सर्पदंश झालेले रुग्ण येत आहे.या विविध कारणाने होणाºया मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणता येते. मात्र शासन दरबारी याचा स्वतंत्र विचार केला जात नाही. ही आकडेवारी वैद्यकीय रुग्णालयातून शासनाचे धोरण निश्चित करणाºया घटकापर्यंत पोहोचत नाही. फवारणी विषबाधेचा मुद्दा राजकीय वळणावर गेल्यावरच त्याची दखल घेतली जाते.प्रशासनस्तरावरून कोरोना संसर्ग व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची काटेकोर नोंद ठेवली जात आहे. इतकेच नव्हे तर संसर्गाचा फैलाव होऊन नये म्हणून कोरोना मृतावर नगरपरिषदेची चमू अंत्यसंस्कार करत आहे. यामुळे सर्वसमान्यांनी याची धास्ती घेतली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे तीन हजार २४९ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी २२१९ बरे झाले आहेत. तर ८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तरीही कोरोनामुळे होणाºया मृत्यूची सर्वात जास्त भीती बाळगली जात आहे. तुलनेने इतर अजारामुळे होणाºया मृत्यूकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोना इतकीच खबरदारी इतर आजाराच्या मृत्यूबाबत घेतल्यास मृत्यूदर कमी करता येणार आहे.3,286जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरसह मेडिकलमध्ये केलेल्या एकूण तपासणीपैकी आतापर्यंत तीन हजार २८६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यापैकी दोन हजार ४६२ (६८.२९%) रुग्ण उपचाराने पूर्णपणे बरे झाले. तर आता कोरोना वार्डसह अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९७ (२३.९७%) इतकी आहे. तर यापैकी ८५ (२.६४%) पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही आकडेवारी ३० आॅगस्टपर्यंतची आहे.1,27,413मेडिकलच्या बाह्य रुग्ण तपासणी विभागात गेल्या सहा महिन्यात एक लाख २७ हजार ४१३ रुग्ण तपाणीसाठी आले. यापैकी एक लाख ९ हजार २१४ रुग्ण (८५.७१%) बाह्य विभागातच उपचार घेऊन घरी परत गेले. तर १८ हजार १९९ रुग्ण (१४.२८%) रुग्णालयातील विविध विभागात उपचारासाठी दाखल झाले. यापैकी ६५३ (३.५८%) रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूला विविध कारणे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या