शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८३४ बालके कमी वजनाने कुपोषणाच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:09 IST

Yavatmal : बाळाचा जन्म झाल्यावर किमान अडीच किलो वजन असणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सुदृढ माता आणि बालकांसाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. याकरिता बालकांना आणि मातेलाही पौष्टिक खाद्यपदार्थ गाव पातळीवर दिले जात आहेत. यानंतरही जिल्ह्यात ८३४ बालके कुपोषणाच्या छायेत असल्याची बाब पुढे आली आहे. कमी वजनामुळे सौम्य कुपोषणाच्या छायेत असलेल्या या बालकांमुळे आरोग्य यंत्रणेसह बालकांच्या माता-पित्यांना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात २६९१ अंगणवाडी आणि बालवाडी आहेत. या अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांची संख्या दीड ते दोन लाखांच्या घरात आहे. या बालकांच्या आरोग्याकरिता विशेष मोहीम राबविली जात आहे. यासोबतच गावपातळीवर बालकांची विशेष काळजी घेतली जात आहे. 

लसीकरण वेळेवर करता यावे म्हणून अंगणवाडीस्तरावर कॅम्प घेतले जातात. यानंतरही कमी वजनाची बालके गाव पातळीवर आढळली आहेत. यामुळे माता- पित्यांना आणि आरोग्य विभागाला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे.

जन्मतःच हवे अडीच किलो वजन बाळाचा जन्म झाल्यावर किमान अडीच किलो वजन असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक बाळं ही दीड किलो ते काही ग्रॅम वजनाची जन्माला येतात. अशा बाळाची वर्षभर मातेला विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा बाळाला काचेतही ठेवावे लागते. अशा बाळांच्या सुदृढ वाढीसाठी पोषण आहार महत्त्वाचा आहे.

तीन ते सहा वर्षांच्या बालकांसाठी विशेष आहार या योजनेत प्रीमिक्स खिचडी, मायक्रो न्यूट्रन्स आणि मूगडाळ, 3 तुरडाळीची खिचडी पॅक दिले जातात. संपूर्ण प्रक्रिया केलेले हे पौष्टिक आहाराचे पॅकेट घरपोच दिले जातात. यातून संतुलित वाढ व्हावी हा मूळ उद्देश आहे. महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून हा पोषण आहार बालकांना दिला जात आहे. हा आहार जनजागृतीअभावी बाहेर फेकला जातो.

व्हीआयडीसी केंद्राच्या माध्यमातून ९० दिवस लक्ष जिल्ह्यात कमी वजनाच्या सौम्य कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी व्हीआयडीसी केंद्रात या बालकांवर उपचार केले जातात. त्यासाठी ९० दिवसांचा विशेष कार्यक्रम आहे. यात बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. त्याचे वजन वाढ- विण्यावर विशेष भर दिला जातो. वय आणि बालकांची उंची यानुसार त्याचे वजन किती असावे, यावरील आरोग्याच्या निकषांनुसार यात उपाययोजना होतात. 

बीपी, शुगर आणि आजारपणाने बाळाचे वजन प्रभावितगरोदरपणात मातेला बीपी, शुगर अथवा इतर आजार असेल तर त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. याठिकाणी बाळाचे वजन कमी होण्याचा धोका असतो. अनेकवेळा बाळं वेळेपूर्वी जन्माला येतात. अशी बालके विविध आजारांना बळी पडतात. यातून शारीरिक व्याधी निर्माण होते.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ