शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

जिल्ह्यातील ८३४ बालके कमी वजनाने कुपोषणाच्या छायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:09 IST

Yavatmal : बाळाचा जन्म झाल्यावर किमान अडीच किलो वजन असणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सुदृढ माता आणि बालकांसाठी शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. याकरिता बालकांना आणि मातेलाही पौष्टिक खाद्यपदार्थ गाव पातळीवर दिले जात आहेत. यानंतरही जिल्ह्यात ८३४ बालके कुपोषणाच्या छायेत असल्याची बाब पुढे आली आहे. कमी वजनामुळे सौम्य कुपोषणाच्या छायेत असलेल्या या बालकांमुळे आरोग्य यंत्रणेसह बालकांच्या माता-पित्यांना त्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात २६९१ अंगणवाडी आणि बालवाडी आहेत. या अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बालकांची संख्या दीड ते दोन लाखांच्या घरात आहे. या बालकांच्या आरोग्याकरिता विशेष मोहीम राबविली जात आहे. यासोबतच गावपातळीवर बालकांची विशेष काळजी घेतली जात आहे. 

लसीकरण वेळेवर करता यावे म्हणून अंगणवाडीस्तरावर कॅम्प घेतले जातात. यानंतरही कमी वजनाची बालके गाव पातळीवर आढळली आहेत. यामुळे माता- पित्यांना आणि आरोग्य विभागाला विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे.

जन्मतःच हवे अडीच किलो वजन बाळाचा जन्म झाल्यावर किमान अडीच किलो वजन असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक बाळं ही दीड किलो ते काही ग्रॅम वजनाची जन्माला येतात. अशा बाळाची वर्षभर मातेला विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा बाळाला काचेतही ठेवावे लागते. अशा बाळांच्या सुदृढ वाढीसाठी पोषण आहार महत्त्वाचा आहे.

तीन ते सहा वर्षांच्या बालकांसाठी विशेष आहार या योजनेत प्रीमिक्स खिचडी, मायक्रो न्यूट्रन्स आणि मूगडाळ, 3 तुरडाळीची खिचडी पॅक दिले जातात. संपूर्ण प्रक्रिया केलेले हे पौष्टिक आहाराचे पॅकेट घरपोच दिले जातात. यातून संतुलित वाढ व्हावी हा मूळ उद्देश आहे. महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून हा पोषण आहार बालकांना दिला जात आहे. हा आहार जनजागृतीअभावी बाहेर फेकला जातो.

व्हीआयडीसी केंद्राच्या माध्यमातून ९० दिवस लक्ष जिल्ह्यात कमी वजनाच्या सौम्य कुपोषित बालकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी व्हीआयडीसी केंद्रात या बालकांवर उपचार केले जातात. त्यासाठी ९० दिवसांचा विशेष कार्यक्रम आहे. यात बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. त्याचे वजन वाढ- विण्यावर विशेष भर दिला जातो. वय आणि बालकांची उंची यानुसार त्याचे वजन किती असावे, यावरील आरोग्याच्या निकषांनुसार यात उपाययोजना होतात. 

बीपी, शुगर आणि आजारपणाने बाळाचे वजन प्रभावितगरोदरपणात मातेला बीपी, शुगर अथवा इतर आजार असेल तर त्याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. याठिकाणी बाळाचे वजन कमी होण्याचा धोका असतो. अनेकवेळा बाळं वेळेपूर्वी जन्माला येतात. अशी बालके विविध आजारांना बळी पडतात. यातून शारीरिक व्याधी निर्माण होते.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ