शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यात तीन वर्षांत ८२ बालमृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 05:00 IST

वणी तालुका हा कोळसा खाणींनी व्यापला आहे. त्यामुळे या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात आरोग्याची समस्या अतिशय बिकट झाली आहे. त्यातून बालमृत्युचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाच्या मते, बाळाच्या जन्मानंतर त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. मात्र ग्रामीण भागात ती घेतली जात नाही. जन्मानंतर बाळाला उबदार वातावरणाची गरज असते.

ठळक मुद्देविविध कारणे : चालू आर्थिक वर्षात मात्र बालमृत्यूचे प्रमाण घटले

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यात गेल्या तीन वर्षांमध्ये शून्य ते एक वर्षे वयोगटातील ८५ बालमृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक ३२ बालमृत्यू सन २०१७-१८ मध्ये झाले आहेत.वणी तालुका हा कोळसा खाणींनी व्यापला आहे. त्यामुळे या भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात आरोग्याची समस्या अतिशय बिकट झाली आहे. त्यातून बालमृत्युचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य विभागाच्या मते, बाळाच्या जन्मानंतर त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. मात्र ग्रामीण भागात ती घेतली जात नाही. जन्मानंतर बाळाला उबदार वातावरणाची गरज असते. मात्र अनेकदा असे वातावरण मिळत नाही. हायपो ग्लासीमीया, न्युमोनिया यासारख्या आजाराची बाधा नवजात बालकाला होते. त्यातून अनेकदा मृत्यू ओढवतो. सन २०१७-१८ या वर्षात वणी तालुक्यात तब्बल ३२ बालमृत्यू झालेत. सन २०१८-१९ मध्ये २६ बालमृत्यू झालेत, तर सन २०१९-२० (एप्रिल १९ ते डिसेंबर १९) या वर्षात २४ बालमृत्यू झाले. एकूण आकडेवारीवर नजर फिरविल्यास मागील वर्षात बालमृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.वणी तालुक्यात शिरपूर, कायर, कोलगाव व राजूर कॉलरी अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु रिक्तपदांमुळे ही आरोग्य केंद्र पांगळी झाली आहेत. चारपैकी कोलगाव व कायर येथे सर्वाधिक प्रसुती केली जाते. परंतु चारही प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणावर रिक्तपदे आहेत. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.कोलगाव आरोग्य केंद्रात १ औषध निर्माण अधिकारी, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ कनिष्ठ लिपीक, १ नेत्र चिकीत्सा सहाय्यक, चार आरोग्य सेवक (पुरूष), पाच आरोग्यसेवक (महिला), १ वाहनचालक, तीन परिचर अशी १७ पदे रिक्त आहेत. उर्वरित तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचीही अशीच अवस्था आहे. कायर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ पदे मंजूर असली तरी त्यातील तब्बल २० पदे रिक्त आहेत. उर्वरित दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांचे हेच हाल आहेत. कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने रुग्णांना हवी तशी आरोग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.वणी तालुक्यात प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड असल्याने त्याचाही परिणाम बालकांच्या आरोग्यावर होत आहे. या भागात कोळसा खाणी असल्याने कोळशाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे कोळशाची धूळ सदैव वातावरणात पसरत असते. त्यातूनच अनेक बालकांना जन्मताच दमा या आजारांची बाधा होत आहे.८४ अर्भकांचा उदरातच झाला मृत्यूवणी तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण जसे अधिक आहेत. तसेच कमी दिवसात प्रसुती होण्याचे प्रमाणही जास्त आहे. यातून गेल्या तीन वर्षांत ८४ अर्भकांचा मातेच्या उदरातच मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल