शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जिल्हा परिषदेच्या ७६ शाळांवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:33 IST

जिल्हा परिषदेच्या तब्बल ७६ शाळा पुढील शैक्षणिक सत्रापासून बंद होण्याचा धोका वाढला आहे. या शाळांमध्ये केवळ दहाच विद्यार्थी असल्याने त्या बंद पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदहाच विद्यार्थी : २९२ शाळांमध्ये पटसंख्या कमी, पुढील शैक्षणिक सत्रात बंदची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या तब्बल ७६ शाळा पुढील शैक्षणिक सत्रापासून बंद होण्याचा धोका वाढला आहे. या शाळांमध्ये केवळ दहाच विद्यार्थी असल्याने त्या बंद पडण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेच्या जवळपास २४२६ शाळा आहेत. यात पहिली ते पाचवीपर्यंतच्या दोन हजार ३८ शाळा आहे. त्यात जवळपास एक लाख ४३ हजार २०० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सहावी ते आठवीपर्यंतच्या ३८८ शाळा असून त्यात ४५ हजार ७०० च्या आसपास विद्यार्थी शिकत आहे. या सर्व शाळांमध्ये एक लाख ८८ हजारांच्यावर विद्यार्थी शिक्षण घेतात. तथापि आता ग्रामीण भागात इंग्रजीचे फॅड वाढत आहे. खेडोपाडी कॉन्व्हेन्ट संस्कृती उभी झाली आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर विपरित परिणाम होत आहे.ग्रामीण भागात खासगी शाळा सुरू झाल्याने जिल्हा परिषद शाळांना स्पर्धक निर्माण झाले. त्यात काही खासगी शाळांमध्ये थोड्या जादा सुविधा मिळत असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांचा तिकडे कल वाढला. यामुळे जिल्हा परिषदेच्या ७६ शाळा बंद पडण्याचा धोका वाढला आहे. या शाळांमध्ये केवळ दहाच विद्यार्थी आहेत. पहिली ते पाचवीपर्यंतच्या या शाळा पुढील शैक्षणिक सत्रापासून बंद होण्याची भीती वर्तविली जात आहे. याशिवाय केवळ २० किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या २९२ शाळांवरही संक्रांत ओढवण्याची चिन्हे आहेत.गुणवत्ता सुधारणार कोण ?जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता ढासळत असल्याची सर्वत्र ओरड होत आहे. ही गुणवत्ता सुधारण्यासाठी कोण पुढाकार घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थी संख्या घटत असल्याने शिक्षक अतिरिक्त ठरत आहे. तरीही शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.