शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकासाचे ७४ कोटी गेले परत, उद्योगाचा निधी थांबविला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 05:01 IST

आदिवासींच्या विकासाकरिता आलेला ७४ कोटी रूपयांचा निधी खर्च करता आलेला नाही. अखेर हा निधी आदिवासी विकास विभागाने परत केला आहे.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ - आदिवासींच्या विकासाकरिता आलेला ७४ कोटी रूपयांचा निधी खर्च करता आलेला नाही. अखेर हा निधी आदिवासी विकास विभागाने परत केला आहे. यामध्ये खावटी कर्ज आणि उद्योगाकरिता तरतूद असणाऱ्या ‘न्युक्लिअर बजेट’च्या निधीचा समावेश आहे.आदिवासी भागात शासनाने १९७८ मध्ये खावटी कर्ज योजना हाती घेतली. यामध्ये ३० टक्के अनुदान तर ७० टक्के रक्कम कर्जस्वरूपात अथवा धान्य स्वरूपात दिली जाते. त्यानुसार दरवर्षी शेतकºयांना खावटी कर्ज दिले जात होते. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, कोलाम, कातकरी आणि माडिया या आदीम जमातीचा समावेश आहे. तर नंदूरबार, नाशिक, ठाणे, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना प्राधान्य देण्यात आले आहे. २०१३-१४ मध्ये रोखीने खावटी कर्ज वितरणाचा सुधारित निर्णय घेण्यात आला. मात्र २०१४ मध्ये युती शासनाने कर्ज वाटपाची हमी घेणे टाळले आहे. यामुळे आदिवासी विकास विभागाने शासनाकडून कुठलेही निर्देश नसल्याने २०१४ पासून खावटी कर्ज वाटप बंद केले. तसा उल्लेख ४५ व्या वार्षिक अहवालात करण्यात आला आहे.‘न्युक्लियर बजेट’च्या बाबतीत असेच झाले आहे. आदिवासी बांधवांना उद्योग उभे करता यावे म्हणून ५० टक्के अनुदानावर ही योजना राबविली जात होती. मात्र ही योजना अलीकडे थांबविण्यात आली आहे. बजेट आखताना खावटी कर्ज आणि न्युक्लिअर बजेटमध्ये तरतूद केली जाते. मात्र, खर्च करण्यासंदर्भात आदेश नसल्याने निधी पडून राहतो.

टॅग्स :GovernmentसरकारYavatmalयवतमाळ