शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

वित्त आयोगाचे ७४ कोटी अखर्चित

By admin | Updated: March 13, 2017 00:55 IST

चौदाव्या वित्त आयोगातून तब्बल १०० कोटींचा निधी मिळाला. मात्र ग्रामपंचायतींच्या उदासिनतेने अद्याप ७४ कोटींचा निधी

ग्रामपंचायती उदासीन : पंचायतचा वचक ओसरला रवींद्र चांदेकर   यवतमाळ चौदाव्या वित्त आयोगातून तब्बल १०० कोटींचा निधी मिळाला. मात्र ग्रामपंचायतींच्या उदासिनतेने अद्याप ७४ कोटींचा निधी अखर्चितच असल्याचे वास्तव समोर आले आहे. शासनाने थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील ११९८ ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून तब्बल १०० कोटी १८ लाख ६८ हजारांचा निधी मिळाला. मात्र ग्रामपंचायतींच्या उदासीन धोरणामुळे विकास कामांना चालनाच मिळाली नाही. तथापि १२६६ ग्रामपंचायतींनी १०६५ कामे सुरू केली आहे. या कामांवर आत्तापर्यंत केवळ २६ कोटी ७५ लाख ८४ हजारांचा खर्च झाला. अद्याप ग्रामपंचायतींकडे ७४ कोटींचा निधी अखर्चित आहे. या निधीतून पुसद तालुक्यातील ११९ ग्रामपंचायतींना तब्बल ११ कोटी ८८ लाख ११ हजार मिळाले. यवतमाळ तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींना १० कोटी ८७ लाख ४८ हजार, तर उमरखेड तालुक्यातील ९२ ग्रामपंचायतींना नऊ कोटी ४४ लाख मिळाले. महागावच्या ७६ ग्रामपंचायतींना आठ कोटी पाच लाख ९९ हजार, तर दारव्हातील ८६ ग्रामपंचायतींना सात कोटी दोन लाख ७७ हजार मिळाले. वणी तालुक्याला सहा कोटी ९० लाख, आर्णीला सहा कोटी ४८ लाख, पांढरकवडाला पाच कोटी ९७ लाख ६७ हजार मिळाले. मात्र ग्रामपंचायतींच्या उदासिनतेने आत्तापर्यंत केवळ २६ कोटी ७५ लाख ८४ हजारांचाच खर्च झाला. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचा ग्रामपंचायतींवर वचक नसल्याने अनुदान मिळूनही गावांमध्ये विकास कामे रखडली आहे. याकडे पंचायत विभागाचे दुर्लक्ष आहे. मार्च एन्डींगमुळे ऐनवेळी धावपळ जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग आता मार्च एन्डींगची धास्ती घेऊन चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्ची घालण्यासाठी ग्रामपंचायतींच्या पाठीमागे लकडा लावीत आहे. मात्र जे काम गेले वर्षभर जमले नाही, ते आता काही दिवसांतच कसे शक्य आहे, असा प्रश्न आहे. शासन भरभरून निधी देत असताना ग्रामपंचायतींना तो खर्च करता येत नाही. परिणामी विकास कामे रखडतात. तरीही पंचायत प्रशासन वर्षभर हाताला घडी घालून बसून असल्याचेच हे द्योतक आहे. जिल्ह्यातील ११९८ पैकी १२६६ ग्रामपंचायतींना कामांसाठी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली. प्रत्यक्षात १०६५ ग्रामपंचायतींनीच कामे सुरू केली. अर्थात १३३ ग्रामपंचायतींनी अद्याप या निधीला हातच लावला नसल्याचे स्पष्ट होत आहे. तरीही पंचायत प्रशासन उदासीन आहे.