शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

वरुडच्या रोपवाटिकेतील ७० हजारांची वृक्षे वाळली

By admin | Updated: October 28, 2014 23:26 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने सन २०११-१२ पासून शतकोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपूर्ण यंत्रणेला दिले आहे. परंतु या योजनेचा हेतू यशस्वी होताना दिसत नाही.

पुसद : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने सन २०११-१२ पासून शतकोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपूर्ण यंत्रणेला दिले आहे. परंतु या योजनेचा हेतू यशस्वी होताना दिसत नाही. पुसद तालुक्यातील वरूड येथील रोपवाटिकेच्या कामात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याने ६० ते ७० हजार रुपये निकामी होऊन ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीबाबत ग्रामपंचायत सदस्यांसह दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याप्रकरणी ग्रामस्थांची भूमिका पाहता परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील वरूड येथे रोपवाटीकेचे काम हाती घेण्यात आले होते. या योजनेंतर्गत वरूड ग्रामपंचायतीला एक लाख रोपे तयार करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. दरम्यान एक ते नऊ महिन्यांपर्यंत ६० ते ७० हजार उत्कृष्ट दर्जाची रोपे शासनाकडून पुरविण्यात आली. परंतु सदर रोपांचे प्राकलन करण्यात आले नाही. त्यामुळे ती ६० ते ७० हजार रोपे वाया गेली. यामध्ये ग्रामपंचयतीचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची तक्रार ग्रामपंचायतचे सदस्य विश्वंभर सूर्य, देवराव डांगे व इतर गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच केले आहे. त्यानुसार संबंधित प्रकरणाची चौकशी कृषी अधिकाऱ्यांमार्फत १७ मे रोजी करण्यात आली होती. त्यानुसार रोपवाटिकेच्या लाखो रुपयांच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायत सचिव व संबंधितांवर कारवाई करण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना १८ जुलै २०१४ रोजी एका आदेशाने दिले आहेत. मात्र रोपवाटिकेच्या कामात हलगर्जीपणा केल्याने झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीस जबाबदार असलेल्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने याप्रकरणी गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यानुसार वरुड ग्रामपंचायतचे सचिव व संबंधितांसह वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पुसद पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतचे सदस्य विश्वंभर सूर्य यांनी केली आहे. तसेच याप्रकरणातील दोषींवर कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासन नेमकी काय कारवाई करते याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष्य रागले आहे. (प्रतिनिधी)