शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वरुडच्या रोपवाटिकेतील ७० हजारांची वृक्षे वाळली

By admin | Updated: October 28, 2014 23:26 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने सन २०११-१२ पासून शतकोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपूर्ण यंत्रणेला दिले आहे. परंतु या योजनेचा हेतू यशस्वी होताना दिसत नाही.

पुसद : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत महाराष्ट्र शासनाने सन २०११-१२ पासून शतकोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संपूर्ण यंत्रणेला दिले आहे. परंतु या योजनेचा हेतू यशस्वी होताना दिसत नाही. पुसद तालुक्यातील वरूड येथील रोपवाटिकेच्या कामात मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याने ६० ते ७० हजार रुपये निकामी होऊन ग्रामपंचायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीबाबत ग्रामपंचायत सदस्यांसह दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याप्रकरणी ग्रामस्थांची भूमिका पाहता परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यातील वरूड येथे रोपवाटीकेचे काम हाती घेण्यात आले होते. या योजनेंतर्गत वरूड ग्रामपंचायतीला एक लाख रोपे तयार करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. दरम्यान एक ते नऊ महिन्यांपर्यंत ६० ते ७० हजार उत्कृष्ट दर्जाची रोपे शासनाकडून पुरविण्यात आली. परंतु सदर रोपांचे प्राकलन करण्यात आले नाही. त्यामुळे ती ६० ते ७० हजार रोपे वाया गेली. यामध्ये ग्रामपंचयतीचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची तक्रार ग्रामपंचायतचे सदस्य विश्वंभर सूर्य, देवराव डांगे व इतर गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे यापूर्वीच केले आहे. त्यानुसार संबंधित प्रकरणाची चौकशी कृषी अधिकाऱ्यांमार्फत १७ मे रोजी करण्यात आली होती. त्यानुसार रोपवाटिकेच्या लाखो रुपयांच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या ग्रामपंचायत सचिव व संबंधितांवर कारवाई करण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना १८ जुलै २०१४ रोजी एका आदेशाने दिले आहेत. मात्र रोपवाटिकेच्या कामात हलगर्जीपणा केल्याने झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीस जबाबदार असलेल्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने याप्रकरणी गावकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यानुसार वरुड ग्रामपंचायतचे सचिव व संबंधितांसह वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या पुसद पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतचे सदस्य विश्वंभर सूर्य यांनी केली आहे. तसेच याप्रकरणातील दोषींवर कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासन नेमकी काय कारवाई करते याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष्य रागले आहे. (प्रतिनिधी)