शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पूस धरणापाठोपाठ इसापूर धरणातही ५५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 06:00 IST

पूस धरणात परतीच्या पावसामुळे ८० टक्के जलसाठा निर्माण झाला असून त्याचबरोबर इसापूर धरणातसुद्धा ५५ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात पाण्याचा ओढा चालूच आहे. इसापूर धरण हे मोठे धरण असून यावर विदर्भातील सुमारे १५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. तसेच मराठवाड्यातील सुमारे ९१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा परिणाम । रबी पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : जूनपूर्वी पूस आणि इसापूर या दोन्ही मोठ्या धरणांमध्ये जलसाठा अत्यल्प उरला होता. त्यामुळे परिसरातील शेतीसिंचनाचा गंभीर प्रश्न उद्भवला होता. मात्री एकीकडे परतीच्या पावसाने खरिपातील पिकांना मोठा फटका दिला असला तरी याच पावसामुळे पूसपाठोपाठ इसापूर धरणातील जलसाठाही वाढला आहे. त्यामुळे किमान रब्बी हंगामातील पीक घेण्याची शेतकऱ्यांची आशा वाढली आहे.पूस धरणात परतीच्या पावसामुळे ८० टक्के जलसाठा निर्माण झाला असून त्याचबरोबर इसापूर धरणातसुद्धा ५५ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात पाण्याचा ओढा चालूच आहे. इसापूर धरण हे मोठे धरण असून यावर विदर्भातील सुमारे १५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. तसेच मराठवाड्यातील सुमारे ९१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. सुरुवातीच्या पावसाने दगा दिल्यामुळे इसापूर धरणाच्या पातळीने निचांक गाठला होता. परंतु परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने या धरणात प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने आजमितीस धरणात ५५ टक्के जलसंचय निर्माण झाला आहे. यामुळे रब्बीतील पिकाच्या सिंचनासाठी शेतकरी सुखावला आहे. मातीच्या बांधकामातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरण हे महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचे प्रमुख धरण असून त्याची संपूर्ण जलाशय पातळी ४४१ मीटर आहे. आजमितीस पाणीपातळी ४३६ मीटर असून यावर्षीच्या कमी पावसाने रब्बीतील पिकांसाठी पाणी मिळणे अवघड असल्याचे वाटत होते. मात्र पावसाळ्याच्या शेवटच्या अंकात पावसाने खरीप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असले तरी शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी आशा निर्माण केली आहे.जूनमध्ये होता केवळ मृत जलसाठामागील वर्षी कमी पर्जन्यमानामुळे इसापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा होता. जेमतेमच भरलेल्या या धरणात जून महिन्यापूर्वी केवळ मृत जलसाठाच शिल्लक राहिला होता. मात्र आता परतीच्या पावसाच्या धडाक्याने इसापूर धरणात ५५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील परिसरातील शेतकºयांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

टॅग्स :Damधरण