शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपने घेतली; शिंदेंना धक्का, नाशिकचे ठरवा...; बावनकुळे-भुजबळांचा स्पष्ट संदेश
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
5
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
6
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
7
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
8
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
9
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
10
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
11
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
12
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
13
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
14
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
15
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
16
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
17
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
18
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
19
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
20
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १९ तारखेपासून ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:50 AM

विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे साहित्य संमेलन १९ ते २१ जानेवारीदरम्यान येथील राम शेवाळकर परिसरात संपन्न होत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री येणार विविध कार्यक्रमांची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे साहित्य संमेलन १९ ते २१ जानेवारीदरम्यान येथील राम शेवाळकर परिसरात संपन्न होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्षपदी प्रख्यात लेखक डॉ.शिरीष गोपाळ देशपांडे राहतील.शुक्रवारी दुपारी २ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री मदन येरावार व संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ‘बारोमास’कार डॉ.सदानंद देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

सकाळी ग्रंथदिंडीशुक्रवारी सकाळी १० वाजता नगरवाचनालय ते शेवाळकर परिसर अशी ग्रंथदिंडी निघणार आहे. उद्घाटनाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर, संमेलन समितीच्या आमंत्रक शुभदा फडणवीस तसेच स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित राहतील.

सायंकाळी कवी संमेलनउद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० वाजता कवीवर्य प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित आहे. रात्री ८ वाजता संजय भाकरे फाऊंडेशन निर्मित ‘बाप हा बापच असतो’ या नाटकाचे आयोजन आहे.

‘शेतकऱ्यांची दैना’वर विचारमंथनशनिवारी २० जानेवारीला सकाळी ९ वाजता डॉ.प्रज्ञा आपटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘संतांंचे समाजभान’ या विषयावर तर ११ वाजता खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘शेतकऱ्यांची दैना आणि आपण सगळे’ या विषयावर विचारमंथन होईल.

विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखतदुपारी १ वाजता कवीवर्य विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखत बाळ कुळकर्णी घेतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता अजय आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘आधुनिक तंत्रज्ञानाचे अभिजात साहित्य आणि कलेला आव्हान’ या विषयावर परिसंवाद आणि त्यानंतर ५ वाजता दीपक आसेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे कवी संमेलन होईल. रात्री ८ वाजता ‘वैदर्भीय गीतगंगा’ हा लोकप्रिय मराठी गितांचा कार्यक्रम होईल.

‘माध्यमांची बांधिलकी आणि अभिव्यक्ती’वर परिसंवादरविवारी २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता डॉ.अभय बंग हे ‘विनोबा: शांतता कोर्ट चालू आहे’ या विषयावर बोलतील. सकाळी ११ वाजता बालाजी सुतार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन रंगणार आहे. संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता ‘माध्यमांची बांधिलकी आणि अभिव्यक्ती’ या विषयावर परिसंवाद रंगणार आहे.दुपारी २ वाजता केंद्रीय भूपृष्ठ आणि जहाजबांधणी व नदीविकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.

टॅग्स :literatureसाहित्य