शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे १९ तारखेपासून ६६ वे विदर्भ साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 10:53 IST

विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे साहित्य संमेलन १९ ते २१ जानेवारीदरम्यान येथील राम शेवाळकर परिसरात संपन्न होत आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री येणार विविध कार्यक्रमांची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विदर्भ साहित्य संघाचे ६६ वे साहित्य संमेलन १९ ते २१ जानेवारीदरम्यान येथील राम शेवाळकर परिसरात संपन्न होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्षपदी प्रख्यात लेखक डॉ.शिरीष गोपाळ देशपांडे राहतील.शुक्रवारी दुपारी २ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री मदन येरावार व संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ‘बारोमास’कार डॉ.सदानंद देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

सकाळी ग्रंथदिंडीशुक्रवारी सकाळी १० वाजता नगरवाचनालय ते शेवाळकर परिसर अशी ग्रंथदिंडी निघणार आहे. उद्घाटनाला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर, संमेलन समितीच्या आमंत्रक शुभदा फडणवीस तसेच स्वागताध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार उपस्थित राहतील.

सायंकाळी कवी संमेलनउद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० वाजता कवीवर्य प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित आहे. रात्री ८ वाजता संजय भाकरे फाऊंडेशन निर्मित ‘बाप हा बापच असतो’ या नाटकाचे आयोजन आहे.

‘शेतकऱ्यांची दैना’वर विचारमंथनशनिवारी २० जानेवारीला सकाळी ९ वाजता डॉ.प्रज्ञा आपटे यांच्या अध्यक्षतेखाली ‘संतांंचे समाजभान’ या विषयावर तर ११ वाजता खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘शेतकऱ्यांची दैना आणि आपण सगळे’ या विषयावर विचारमंथन होईल.

विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखतदुपारी १ वाजता कवीवर्य विठ्ठल वाघ यांची प्रकट मुलाखत बाळ कुळकर्णी घेतील. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता अजय आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘आधुनिक तंत्रज्ञानाचे अभिजात साहित्य आणि कलेला आव्हान’ या विषयावर परिसंवाद आणि त्यानंतर ५ वाजता दीपक आसेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरे कवी संमेलन होईल. रात्री ८ वाजता ‘वैदर्भीय गीतगंगा’ हा लोकप्रिय मराठी गितांचा कार्यक्रम होईल.

‘माध्यमांची बांधिलकी आणि अभिव्यक्ती’वर परिसंवादरविवारी २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता डॉ.अभय बंग हे ‘विनोबा: शांतता कोर्ट चालू आहे’ या विषयावर बोलतील. सकाळी ११ वाजता बालाजी सुतार यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन रंगणार आहे. संजय आवटे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता ‘माध्यमांची बांधिलकी आणि अभिव्यक्ती’ या विषयावर परिसंवाद रंगणार आहे.दुपारी २ वाजता केंद्रीय भूपृष्ठ आणि जहाजबांधणी व नदीविकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप होईल.

टॅग्स :literatureसाहित्य