शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारी जाचातून 66 एकर जमीन मुक्त,10 मूळ शेतमालकांना जमिनीचा मिळाला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 14:56 IST

अडचणीच्या काळात तात्काळ पैसे उपलब्ध व्हावे म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी अवैध सावकाराकडून उसनवारी कर्ज घेऊन आपली गरज भागवितात. त्यासाठी ते आपली जमीन किंवा स्थावर मालमत्ता काही कालावधीसाठी सावकाराकडे  ठेवतात.

यवतमाळ- अडचणीच्या काळात तात्काळ पैसे उपलब्ध व्हावे म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी अवैध सावकाराकडून उसनवारी कर्ज घेऊन आपली गरज भागवितात. त्यासाठी ते आपली जमीन किंवा स्थावर मालमत्ता काही कालावधीसाठी सावकाराकडे  ठेवतात. मात्र याचा गैरफायदा घेऊन ती शेतजमीन लाटण्याचे प्रकार अवैध सावकारांकडून होत असते. आपली शेतजमीन परत मिळण्यासाठी तक्रारदारांनी या संदर्भात तक्रारी केल्या. या तक्रारींच्या आधारावर यवतमाळ येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाने कारवाई करून 66 एकर (26.30 हेक्टर) शेतजमीन अवैध सावकारी जाचातून मुक्त केली आहे. या जमिनी मूळ शेतमालकांना परत मिळाल्या असून आपल्या हक्काच्या जमिनीवर शेतकरी शेती करीत आहेत. 

खरीप आणि रब्बी हे शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे हंगाम आहेत. या हंगामाच्या भरोश्यावर शेतक-यांच्या कुटुंबाचा डोलारा वर्षभर चालत असतो. मात्र या काळात शेतीला लावण्यासाठी हाती पैसा नसला की त्याची संपूर्ण घडी विस्कळीत होते. त्यामुळे सावकारांकडून उसनवारी कर्ज घेऊन शेतकरी शेतीची कामे करतात. उत्पन्न निघाले की लगेच सावकाराकडून घेतलेले कर्ज परत करून आपली जमीन मिळण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. मात्र ही शेतजमीन लाखमोलाची असल्याने अवैध सावकार ती परत करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे आपल्या हक्काच्या शेतजमिनीपासून शेतक-यांना वंचित राहावे लागते. असे प्रकार जिल्ह्यात उघडकीस आले आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या तक्रारीवरून अवैध सावकांरानी हडप केलेली 66 एकर शेतजमीन शेतक-यांना परत मिळवून देण्यात आली आहे. 

अवैध सावकारीवर नियंत्रण आणि शेतक-यांची सावकारी जाचातून मुक्तता करण्यासाठी सावकारी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 18 अंतर्गत अवैध सावकारीमधील खरेदी खत रद्द करून 10 शेतक-यांना त्यांच्या मूळ जमिनीचा ताबा मिळाला आहे. यात मिरासे खोपडी (ता.दारव्हा) येथील दारासिंह चव्हाण यांची 2 हेक्टर 03 आर. शेतजमीन, ईरथळ (ता.दारव्हा) येथील सरीता महादेव धोटे यांची 1 हेक्टर 54 आर. आणि 3 हेक्टर 21 आर. शेतजमीन, हातला (ता.उमरखेड) येथील दिनकर देवराव चंद्रवंशी यांची 0 हेक्टर 30 आर. शेतजमीन, शेलोडी (ता.दारव्हा) येथील नामदेव रामकृष्ण राऊत यांची 1 हेक्टर 03 आर. शेतजमीन, बिटरगाव (ता.उमरखेड) येथील राजराम तुकाराम भालगे यांची 0 हेक्टर 89 आर. शेतजमीन, मुडाणा (ता.महागाव) येथील अवधुत रामराव वानखेडे यांची 4 हेक्टर 45 आर. शेतजमीन, उमरखेड येथील कुसुम परसराम लांभाडे यांची 4 हेक्टर 12 आर. शेतजमीन, मुडाणा (ता.महागाव) येथील विनोद विठ्ठल घुमनर यांची  यांची 1.61 हेक्टर 89 आर. शेतजमीन आणि आर्णि येथील मनिष मारोतराव कपले यांची 6 हेक्टर 85 आर. शेतजमीन अशा एकूण 26 हेक्टर 30 आर. शेतजमिनीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेतजमिनी सावकाराने हडप केल्याची प्रकरणे असतील तर यासंदर्भात संबंधित उपनिबंधक कार्यालय, सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी केले आहे.