शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

६४ गावे टंचाईक्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:00 IST

अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून फेब्रुवारी महिन्यातच आठ तालुक्यांची स्थिती बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण विभागाने जिल्ह्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले असून दुष्काळ निवारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.

ठळक मुद्देआठ तालुक्यात स्थिती बिकट : दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून फेब्रुवारी महिन्यातच आठ तालुक्यांची स्थिती बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण विभागाने जिल्ह्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले असून दुष्काळ निवारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.यवतमाळ जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जलस्रोत तळाला गेले असून भूजल पातळीही खालावत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील १६३ गावांची भूजल पातळी दीड मीटरने खाली गेली आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंंचाई निवारण विभागाने यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, आर्णी, राळेगाव, दारव्हा, वणी आणि नेर तालुक्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यामुळे या गावात पाणीटंचाई समस्या सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहे. या ६४ गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापर्यंत ६७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. आणखी २५० विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. परंतु गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांकडून हे प्रस्ताव शासनाकडे पाठविले जात नाही, असा जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप आहे. त्यावर उपाययोजना म्हणून खास दूत नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या. या दुतामार्फत प्रस्ताव निकाली काढले जाणार आहे.जलप्रकल्पात केवळ २० टक्के पाणीजिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाण्याचा साठा झपाट्याने खाली जात आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये केवळ २० टक्केच पाणीसाठा आहे. त्यात पूस प्रकल्प १८.७८ टक्के, अरुणावती प्रकल्प १२.०९ टक्के, बेंबळा प्रकल्प १६.०३ टक्के, अडाण प्रकल्प २०.३६ टक्के, नवरगाव प्रकल्प ३२.९२ टक्के, गोखी प्रकल्प ९.३२ टक्के, वाघाडी प्रकल्प ११.८२ टक्के, सायखेड प्रकल्प ५९.९० टक्के, अधरपूस ४५.५६ टक्के, बोरगाव १०.१४ टक्के तर ९१ लघु प्रकल्पांमध्ये २२.९८ टक्के जलसाठा आहे. तर तालुक्यातील गणेशपूर, करंजगाव, तोरनाळा, तेलगव्हाण, कोहळा, पांढरी, धानोरा, बोथ, ईचोरी, जांभुळणी, सारफळी, पेटूल, खरडगाव, झोंबाडी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.