शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

६३ हजार नागरिकांना तीव्र पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 22:11 IST

उष्णतेच्या लाटेने भूजलस्त्रोतात मोठी घट नोंदविली जात आहे. यामुळे गावामध्ये पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. २३७ गावांमधील ६३ हजार नागरिकांपुढे भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१५ लघु प्रकल्प कोरडे : २३७ गावांमध्ये भीषण स्थिती, ४३ टँकर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उष्णतेच्या लाटेने भूजलस्त्रोतात मोठी घट नोंदविली जात आहे. यामुळे गावामध्ये पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. २३७ गावांमधील ६३ हजार नागरिकांपुढे भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५ लघु प्रकल्प कोरडे पडल्याने पुढील काळात स्थिती आणखी भीषण होण्याची भीती आहे.मान्सूनची वाट बिकट झाल्याने पावसाचे आगमन जिल्ह्यात लांबणार आहे. पावसाचे आगमन लांबल्याने पाणीटंचाईची स्थिती अधिक भयावह होणार आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने महसूल यंत्रणेला दिल्या आहेत.भूजलाची पातळी घसरल्याने वणी तालुक्यातील १०, दारव्हा १९, पुसद १४, नेर १७, यवतमाळ २४, बाभूळगाव ८, आर्णी ३६, दिग्रस ३३, महागाव ४२, केळापूर १, झरीजामणी ४, घाटंजी २२ तर राळेगावमधील ७ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती भीषण झाली आहे. या गावांमधील पाण्याचा साठा संपला आहे. नागरिकांना गावाबाहेरील विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याकरिता २१० विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे.जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १७ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. तर १५ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. यामध्ये बोरडा, तरोडा, पोफाळी, पहूर तांडा, पहूर इजारा, म्हैसदोडका, हातोला, लोहतवाडी, नेर, देवगाव, रूई, इटोळा, किन्ही, दुधाना, उमर्डा या प्रकल्पांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. इतर काही प्रकल्पही शेवटच्या घटका मोजत आहे. यामुळे या प्रकल्पांचा जलसाठाही काही दिवसात संपण्याच्या मार्गावर आहे. पावसाळा लांबल्यास जलसंकट आणखी गडद होण्याची चिन्हे आहेत.मृगाच्या पावसाचे वेधयेत्या ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे. हवामान विभागाने यावर्षी ९६ टक्के पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा मृगाकडे लागल्या आहे. मात्र मान्सून लांबणीवर असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केल्याने सर्वच काळजीत सापडले आहे. रोहिणी नक्षत्र सुरू झाल्यानंतर अद्यापही दमदार पावसाची हजेरी झाली नाही. त्यामुळे मृगाकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई