शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

पैसेवारी ६० टक्के

By admin | Updated: September 20, 2015 00:01 IST

महसूल विभागाने यंदाच्या खरीप हंगामातील नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची सरासरी पीक आणेवारी ६० टक्के घोषित झाल्याने सर्व सोळाही तालुक्यात पीक परिस्थिती उत्तम असल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम : महसूल विभागाचीही मोहोरयवतमाळ : महसूल विभागाने यंदाच्या खरीप हंगामातील नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची सरासरी पीक आणेवारी ६० टक्के घोषित झाल्याने सर्व सोळाही तालुक्यात पीक परिस्थिती उत्तम असल्याचे मानले जात आहे. दरम्यान शासनाने पैसेवारी निश्चित करण्याची ही ब्रिटिशकालीन पद्धत बदलण्याची तयारी चालविली असून त्याचे निकषही बदलविले जाणार आहे. त्यानंतर मात्र पीक परिस्थितीचा अंदाजसुद्धा बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर या खरीप पिकाची एकूणच स्थिती उत्तम आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, महसूल विभाग यांनीसुद्धा पीक परिस्थिती चांगली असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीसुद्धा गेल्या पाच-दहा वर्षात पहिल्यांदाच एवढी चांगली पिके असल्याचे सांगितले आहे. त्यातच आता पावसाने दमदार हजेरी लावल्याने पीक परिस्थिती आणखी सुदृढ झाली आहे. दरम्यान महसूल प्रशासनाने आपली नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जुन्या नियमानुसार ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असेल तर ती पिके दुष्काळाचे संकेत देतात. परंतु जिल्ह्यात सर्वच तालुक्यात ६० टक्क्यापेक्षा अधिक पीक आणेवारी जाहीर झाल्याने उत्तम पीक परिस्थितीवर महसूल प्रशासनाकडूनही शिक्कामोर्तब झाले आहे.पीक आणेवारी काढण्याच्या या ब्रिटीशकालीन पद्धतीला सुरुवातीपासूनच विरोध सुरू आहे. ही पद्धती बदलावी अशी मागणी आहे. त्याला प्रतिसाद देत आता युती शासनाने पीक आणेवारीची पद्धत आणि त्याचे निकष बदलण्याची तयारी चालविली आहे. त्यात उत्तम पीक आणेवारीसाठी ६७ टक्के हा निकष ठेवला गेला आहे. मात्र अद्याप त्यावर शासनाचे शिक्कामोर्तब झालेले नाही. आणेवारीची नवी पद्धत व नव्या निकषाबाबतची मार्गदर्शक तत्वे शासनाकडून आॅक्टोबरमध्ये जाहीर होणार असल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला दिली. (शहर वार्ताहर)