शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

पैसेवारी ६० टक्के

By admin | Updated: September 20, 2015 00:01 IST

महसूल विभागाने यंदाच्या खरीप हंगामातील नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची सरासरी पीक आणेवारी ६० टक्के घोषित झाल्याने सर्व सोळाही तालुक्यात पीक परिस्थिती उत्तम असल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम : महसूल विभागाचीही मोहोरयवतमाळ : महसूल विभागाने यंदाच्या खरीप हंगामातील नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची सरासरी पीक आणेवारी ६० टक्के घोषित झाल्याने सर्व सोळाही तालुक्यात पीक परिस्थिती उत्तम असल्याचे मानले जात आहे. दरम्यान शासनाने पैसेवारी निश्चित करण्याची ही ब्रिटिशकालीन पद्धत बदलण्याची तयारी चालविली असून त्याचे निकषही बदलविले जाणार आहे. त्यानंतर मात्र पीक परिस्थितीचा अंदाजसुद्धा बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर या खरीप पिकाची एकूणच स्थिती उत्तम आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, महसूल विभाग यांनीसुद्धा पीक परिस्थिती चांगली असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीसुद्धा गेल्या पाच-दहा वर्षात पहिल्यांदाच एवढी चांगली पिके असल्याचे सांगितले आहे. त्यातच आता पावसाने दमदार हजेरी लावल्याने पीक परिस्थिती आणखी सुदृढ झाली आहे. दरम्यान महसूल प्रशासनाने आपली नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जुन्या नियमानुसार ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असेल तर ती पिके दुष्काळाचे संकेत देतात. परंतु जिल्ह्यात सर्वच तालुक्यात ६० टक्क्यापेक्षा अधिक पीक आणेवारी जाहीर झाल्याने उत्तम पीक परिस्थितीवर महसूल प्रशासनाकडूनही शिक्कामोर्तब झाले आहे.पीक आणेवारी काढण्याच्या या ब्रिटीशकालीन पद्धतीला सुरुवातीपासूनच विरोध सुरू आहे. ही पद्धती बदलावी अशी मागणी आहे. त्याला प्रतिसाद देत आता युती शासनाने पीक आणेवारीची पद्धत आणि त्याचे निकष बदलण्याची तयारी चालविली आहे. त्यात उत्तम पीक आणेवारीसाठी ६७ टक्के हा निकष ठेवला गेला आहे. मात्र अद्याप त्यावर शासनाचे शिक्कामोर्तब झालेले नाही. आणेवारीची नवी पद्धत व नव्या निकषाबाबतची मार्गदर्शक तत्वे शासनाकडून आॅक्टोबरमध्ये जाहीर होणार असल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला दिली. (शहर वार्ताहर)