शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पैसेवारी ६० टक्के

By admin | Updated: September 20, 2015 00:01 IST

महसूल विभागाने यंदाच्या खरीप हंगामातील नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची सरासरी पीक आणेवारी ६० टक्के घोषित झाल्याने सर्व सोळाही तालुक्यात पीक परिस्थिती उत्तम असल्याचे मानले जात आहे.

जिल्ह्याची पीक परिस्थिती उत्तम : महसूल विभागाचीही मोहोरयवतमाळ : महसूल विभागाने यंदाच्या खरीप हंगामातील नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्याची सरासरी पीक आणेवारी ६० टक्के घोषित झाल्याने सर्व सोळाही तालुक्यात पीक परिस्थिती उत्तम असल्याचे मानले जात आहे. दरम्यान शासनाने पैसेवारी निश्चित करण्याची ही ब्रिटिशकालीन पद्धत बदलण्याची तयारी चालविली असून त्याचे निकषही बदलविले जाणार आहे. त्यानंतर मात्र पीक परिस्थितीचा अंदाजसुद्धा बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर या खरीप पिकाची एकूणच स्थिती उत्तम आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, महसूल विभाग यांनीसुद्धा पीक परिस्थिती चांगली असल्याचे नमूद केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीसुद्धा गेल्या पाच-दहा वर्षात पहिल्यांदाच एवढी चांगली पिके असल्याचे सांगितले आहे. त्यातच आता पावसाने दमदार हजेरी लावल्याने पीक परिस्थिती आणखी सुदृढ झाली आहे. दरम्यान महसूल प्रशासनाने आपली नजर पीक आणेवारी जाहीर केली आहे. जुन्या नियमानुसार ५० टक्क्यापेक्षा कमी आणेवारी असेल तर ती पिके दुष्काळाचे संकेत देतात. परंतु जिल्ह्यात सर्वच तालुक्यात ६० टक्क्यापेक्षा अधिक पीक आणेवारी जाहीर झाल्याने उत्तम पीक परिस्थितीवर महसूल प्रशासनाकडूनही शिक्कामोर्तब झाले आहे.पीक आणेवारी काढण्याच्या या ब्रिटीशकालीन पद्धतीला सुरुवातीपासूनच विरोध सुरू आहे. ही पद्धती बदलावी अशी मागणी आहे. त्याला प्रतिसाद देत आता युती शासनाने पीक आणेवारीची पद्धत आणि त्याचे निकष बदलण्याची तयारी चालविली आहे. त्यात उत्तम पीक आणेवारीसाठी ६७ टक्के हा निकष ठेवला गेला आहे. मात्र अद्याप त्यावर शासनाचे शिक्कामोर्तब झालेले नाही. आणेवारीची नवी पद्धत व नव्या निकषाबाबतची मार्गदर्शक तत्वे शासनाकडून आॅक्टोबरमध्ये जाहीर होणार असल्याची माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला दिली. (शहर वार्ताहर)