शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

कोर्ट-कचेरीवर ६० लाखांची उधळपट्टी

By admin | Updated: February 4, 2015 23:21 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संचालकांच्या खासगी खटल्यात कोर्ट-कचेरीवर तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

जिल्हा बँक : आठ संचालकांचे खासगी खटले, सहकार मंत्र्यांकडे सुनावणीयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संचालकांच्या खासगी खटल्यात कोर्ट-कचेरीवर तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात थेट सहकार मंत्र्यांकडे सुनावणी झाली असून आता केवळ आदेशाची प्रतीक्षा आहे. सदाशिव महाजन यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत हे प्रकरण लावून धरले आहे. ‘क्लोज फॉर आॅर्डर’ झालेल्या या प्रकरणात काय निर्णय येतो याकडे लक्ष लागले आहे. पाच वर्षांपासून महाजन यांची सहकारातील ही लढाई सुरू आहे. जिल्हा बँकेचे १४ संचालक सेवा सोसायट्यांचे थकबाकीदार असल्याने त्यांच्याकडून या रकमेची वसुली करावी व त्यांना संचालक पदावरून अपात्र करावे अशा मागणीने हा संघर्ष सुरू झाला. तत्कालीन विभागीय सहनिबंधक शामकांत झळके यांनी संचालकांविरुद्ध निकाल दिला होता. त्यावर या संचालकांनी सहकार मंत्र्यांकडून स्थगनादेश मिळविला. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात एकलपीठ, द्विसदस्यीय पीठ व त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पुन्हा नागपूर उच्च न्यायालयात आले. नंतर १४ पैकी आठच संचालकांविरुद्ध प्रकरण दाखल करण्यात आले होते. तर याचिकाकर्त्या तिघांपैकी केवळ महाजन कायम राहिले. कोर्टाची ही लढाई लढताना बँकेच्या तिजोरीतून सुमारे ६० लाख रुपयांचा खर्च केला गेला. वास्तविक संचालकांची ही प्रकरणे वैयक्तिक असल्याने त्यांनी स्वत: कोर्ट-कचेरीचा खर्च करणे अपेक्षित होते. त्यासाठी बँकेच्या तिजोरीतून उधळपट्टी करणे गैर आहे, असे नमूद करीत सदाशिव महाजन यांनी विभागीय सहनिबंधकांकडे वसुलीचे प्रकरण दाखल केले होते. मात्र तेथे संचालकांच्या बाजूने निर्णय लागला. त्याला सहकार मंत्र्यांकडे आव्हान दिले गेले. त्यावरील सुनावणी पूर्ण झाली. आता सहकार मंत्री चंद्रकांत पाटील त्यावर काय निर्णय देतात याकडे लक्ष लागले आहे. ६० लाखांच्या रकमेची या संचालकांकडून वसुली करावी ही प्रमुख मागणी आहे. वकिलांची फी, मुंबई, नागपूर, दिल्ली प्रवास, कोर्ट फी अशा वेगवेगळ्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात आठ संचालकांनी बँकेच्या तिजोरीतून ६० लाख रुपये खर्च केले. शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांची बँक मनमाने पद्धतीने उधळपट्टी करीत आहे. अध्यक्षांसाठी १४ लाखांची ईनोव्हा वाहनाची खरेदी, चहा-पानावर वर्षाकाठी २५ लाखांचा खर्च चर्चेत असताना आता कोर्ट-कचेरीवरील ६० लाखांच्या उधळपट्टीचे प्रकरण पुढे आल्याने बँकेच्या या संचालकांविरुद्ध शेतकरी वर्गात तीव्र असंतोष धुमसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)