शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
2
Pune Crime: कोचिंगमध्ये रक्तरंजित संघर्ष! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ला; एकाचा मृत्यू; हल्ला करणारा विद्यार्थी फरार
3
"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
4
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
5
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
6
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
7
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
8
Health Tips: हृदय विकाराच्या 'या' सात सूक्ष्म संकेतांकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच करा उपाय!
9
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
10
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
11
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
12
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
13
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
14
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
15
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
16
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
17
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
18
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
19
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
20
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
Daily Top 2Weekly Top 5

६० कोटींचा निधी, पण अपेक्षित विकासकामांत दारव्हा पालिकेला आले अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:39 IST

- पाणीपुरवठा योजना अपूर्ण, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव पाणीपुरवठा योजना अपूर्णच : मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव फोटो ...

- पाणीपुरवठा योजना अपूर्ण, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव

पाणीपुरवठा योजना अपूर्णच : मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव

फोटो

ग्राउंड रिपोर्ट भाग १

मुकेश इंगोले

दारव्हा : येथील पालिकेत थेट नगराध्यक्ष आणि आठ नगरसेवक निवडून आल्यानंतर शिवसेनेने नगर परिषदेत सत्ता स्थापन केली. गेल्या चार वर्षांत विकासकामांसाठी ६० कोटी रुपयांचा निधीही मिळाला. परंतु तरीसुद्धा शहराचा अपेक्षित विकास साधता आला नसल्याचे बोलले जात आहे.

सत्ताधाऱ्यांना मागील कार्यकाळात रखडलेली पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेता आली नाही. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मात्र, योग्य नियोजनाअभावी खर्च करूनही शहरवासीयांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडले. त्यामुळे अद्यापही अनेक समस्या कायम आहेत.

राज्यात सत्ता, स्थानिक आमदार आणि नगर परिषदेवर झेंडा फडकल्यानंतर नागरिकांना विकासकामांच्या मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्या कार्यकाळात रखडलेली ३४ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु या योजनेवर टीका करून सत्ता मिळविलेल्या शिवसेनेला चार वर्षांतही ही योजना पूर्णत्वास नेणे शक्य झाले नाही. त्यामुळे काही भागांतील नागरिकांना बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

बॉक्स

मूलभूतऐवजी इतर कामांना प्राधान्य

विविध योजनेंतर्गत विकासकामांसाठी भरपूर निधी प्राप्त झाला. त्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली. परंतु विविध भागांतील समस्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे कामांचे नियोजन करणे आवश्यक असताना मूलभूतऐवजी इतर कामांना जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

बॉक्स

मुबलक शुध्द पाण्याची वानवा

नागरिकांना पक्के रस्ते, नाली, पथदिवे, स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. पाणीपुरवठा योजना रेंगाळल्याने मुबलक व शुध्द पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

बॉक्स

पालिकेच्या उत्पन्न वाढीकडे दुर्लक्ष

नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी गेल्या चार वर्षांत फारसे प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. शहरात रस्त्यावरील अतिक्रमण, वाहन पार्किंग, मोकट जनावरांचा मुक्त संचार यासारख्या समस्या कायम आहेत.

बॉक्स

लेंडी नाल्याच्या बांधकामाकडे दुर्लक्ष

शहराला वेठीस धरणाऱ्या लेंडी नाल्याचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी याच नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात, दुकानांमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले. तसेच रस्त्यावर कंबरभर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरवर्षी पावसाळ्यात ही परिस्थिती निर्माण होते. वर्षभर नाल्यात घाण पाणी साचून राहते. त्यामुळे दुर्गंधी, डासांचे प्रमाण वाढल्याने विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. तरीसुद्धा या नाल्याची साफसफाई करून बांधकाम करण्यात आले नाही.

बॉक्स

रस्ते, नाल्यांची दुरवस्था

शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, गांधी ले-आऊट, बायपास परिसरातील काही नगरांसह जुन्या वसाहतीतील काही भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर काही परिसरात नाली बांधकाम झाले नसल्याने कच्च्या नाल्यातून सांडपाणी वाहून जात नाही. परिणामी ठिकठिकाणी घाण साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

280821\20210711_181709.jpg

१)शहरातील झालेल्या रस्त्यांची दुरावस्था

२)लेंडी नाल्यात याप्रमाणे झाडेझुडपे वाढली आहे