शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

ऑगस्ट महिन्यात ५९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडणे सुरू झाले. मार्चमध्ये अवघे तीन रुग्ण होते. एप्रिलमध्ये हा आकडा ८८ वर गेला. मे महिन्यात कडक उन्ह आणि त्यातच लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा कमी होऊन ३५ वर आला. याच महिन्यात एक मृत्यूही झाला. मात्र जूनमध्ये पावसाळा सुरू होताच गारव्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणे सुरू झाले.

ठळक मुद्देएकाच महिन्यात सर्वाधिक कोरोना ब्लास्ट : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संसर्गाच्या दृष्टीने गेल्या सहा महिन्यात ऑगस्ट महिना सर्वाधिक हॉट ठरला आहे. या एकाच महिन्यात तब्बल दोन हजार ३१४ पॉझिटिव्ह रुग्ण नोंदविले गेले असून तब्बल ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्ण सापडण्याची गती ऑगस्ट पेक्षाही किती तरी पट अधिक आहे.मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडणे सुरू झाले. मार्चमध्ये अवघे तीन रुग्ण होते. एप्रिलमध्ये हा आकडा ८८ वर गेला. मे महिन्यात कडक उन्ह आणि त्यातच लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी झाल्याने कोरोना रुग्णांचा आकडा कमी होऊन ३५ वर आला. याच महिन्यात एक मृत्यूही झाला. मात्र जूनमध्ये पावसाळा सुरू होताच गारव्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणे सुरू झाले. मेच्या तुलनेत जूनमध्ये पाच पट तर जूनच्या तुलनेत जुलैमध्ये हे रुग्ण सहा पटीने वाढले. जुलैमध्ये रुग्णसंख्या ८०६ होती, ऑगस्टमध्ये हा आकडा थेट अडीच हजारांच्या घरात पोहोचला. मृत्यूसंख्याही १९ वरून तीन पटीने वाढून ५९ वर पोहोचली. आता सप्टेंबर महिना सुरू झाला. या महिन्याच्या सातच दिवसात कोरोना रुग्णसंख्या ११०० वर पोहोचली असून मृतांचा आकडा ३७ झाला आहे. यावरून संपूर्ण सप्टेंबर महिना आणि नंतरच्या ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची गती किती वेगवान असेल याचा अंदाज येतो. उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात कोरोना रुग्ण अधिक वाढले. यावरून गारवा कोरोनासाठी पोषक असल्याचे स्पष्ट होते. पुढे तीन महिने हिवाळा आहे. ही थंडी कोरोनासाठी आणखी अनुकूल वातावरण निर्माण करणारी ठरणार आहे. त्यामुळे हिवाळ्यात कोरोनाची गती आणखी वाढते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.नागरिकांंनो, सावधगिरी बाळगारूग्णांची आकडेवारी पाहता आरोग्य विभागाने पुढील दोन महिने अधिक सावधगिरी बाळगावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात कोरोना मृत्यू व रुग्णांची गती प्रचंड वाढत आहे. लवकरच येणाऱ्या हिवाळ्यात ही गती आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कोरोना रुग्णसंख्या अकराशे पार गेली आहे. तब्बल ३७ जणांचे सात दिवसात मृत्यू झाले आहे. अनलॉकचा आणि नागरिकांच्या बेशिस्त व बिनधास्तपणे वावरण्याचा हा परिणाम मानला जातो. लॉकडाऊनच्या काळात कोरोना स्थिती बºयापैकी नियंत्रणात असल्याचे मार्च ते जुलै दरम्यान प्रशासनाकडे नोंदविल्या गेलेल्या एकूणच आकडेवारीवरून दिसून येते.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या