शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

टिपेश्वर अभयारण्यात ५७ चंदन वृक्षांची तोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:31 IST

तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील नर्सरीतून १२ ते १५ आॅगस्टदरम्यान चंदनाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल ५७ वृक्षांची अवैधरित्या कत्तल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपांढरकवडा वन्यजीव विभागाची लक्तरे वेशीवर : कारंजाच्या दोघांना अटक, तिघे फरार, निष्क्रियता की मिलीभगत ?

नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्याच्या टिपेश्वर अभयारण्यातील नर्सरीतून १२ ते १५ आॅगस्टदरम्यान चंदनाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल ५७ वृक्षांची अवैधरित्या कत्तल करण्यात आली आहे. या वृक्षतोडीमुुळे वन्यजीव विभागातील संबंधित तमाम अधिकारी व कर्मचाºयांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.दरम्यान, या चंदनवृक्षतोडप्रकरणी कारंजा (जि.वाशिम) येथील रमजू शिकारी नंदावाले (५५) आणि रहेमान गारवे (३३) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांचे तीन साथीदार वन अधिकाºयांना चकमा देवून फरार होण्यात यशस्वी झाले. टिपेश्वर अभयारण्यातील सुन्ना बीटमध्ये कंपार्टमेंट क्र.१०० अंतर्गत पिलखान नर्सरी परिसरात चंदनाच्या परिपक्व झाडांची ही तोड करण्यात आली. सागवान, चंदन तस्करांची ही मोठी टोळी आहे. सहा वर्षांपूर्वी ती या अभयारण्यात येऊन गेली होती. तेव्हापासून त्यांना या चंदनाचे लोकेशन होते. १२ आॅगस्टला ते या जंगलात येऊन गेले. परंतु त्या दिवशी वन अधिकारी गस्तीवर असल्याने ते १३ ला आले. नंतर पुन्हा १५ ला आले. त्यांनी १२ आॅगस्टला १५ व १५ आॅगस्टला ३५ अशा ५० चंदन वृक्षांची तोड केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात हा आकडा ५७ पेक्षा अधिक आहे. १५ आॅगस्टला गस्तीदरम्यान या टोळीतील दोघे पकडल्या गेले. मात्र तिघे फरार होण्यात यशस्वी झाले. अटकेतील दोघांची चार दिवस वनकोठडी घेवून नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्यांनी अत्याधुनिक मशीनद्वारे या चंदनवृक्षांची तोड केली असावी, असा संशय आहे. या वृक्षतोडीमुळे वन्यजीव विभागात खळबळ निर्माण झाली आहे.मारेगाव, पैनगंगा अभयारण्यातही प्रचंड वृक्षतोडमारेगावमधील बीट क्र.१०९, ११० व ११५ मध्ये गेल्या काही दिवसात मोठ्या गोलाईच्या सुमारे २००-२५० सागवानवृक्षांची तोड करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यामध्ये उमरखेड, खरबी, बिटरगाव वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सागवान तोड व तस्करी सुरू आहे. सागवान व चंदन वृक्षतोडीमुळे पांढरकवडा वन्यजीव विभागातील अधिकाºयांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.‘वन्यजीव’चे नियंत्रण चक्क नागपुरातून !वन्यजीव विभागाचे मुख्यालय नागपुरात आहे. ऋषिकेश रंजन हे या विभागाचे मुख्य वनसंरक्षक आहे. नागपुरातून टिपेश्वरचा कारभार हाकला जातो. पांढरकवडा येथे वन्यजीव विभागाला बी.पी. राठोड उपवनसंरक्षक आहे. येथील सहायक वनसंरक्षक बोराडे यांची बदली झाल्यापासून ही जागा रिक्त आहे. चंदनवृक्षतोड झालेले क्षेत्र टिपेश्वरचे आरएफओ अमर सिडाम यांच्या कार्यक्षेत्रात येते. टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्याचे नियंत्रण नागपूरऐवजी अमरावतीमधून व्हावे, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. नागपुरातील नियंत्रणामुुळे येथील वन्यजीव यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. त्यामुळे कुणाचाच पायपोस कुणाच्या पायात नसतो. पर्यायाने तस्कर सक्रीय होऊन वनसंपत्तीचा ºहास होतो. चंदन व सागवान तोडीच्या या प्रकरणात वन्यजीव अधिकारी-कर्मचाºयांचा हलगर्जीपणा दिसत असला तरी प्रत्यक्षात तस्करांशी मिलीभगत तर नाही ना, हे शोधण्याचे आव्हान ऋषिकेश रंजन यांच्यापुढे आहे.रात्रगस्तीमुळे चंदन वृक्ष तस्कर टोळीतील दोघांना पकडण्यात यश आले. अन्य तिघे फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.- बी.पी. राठोडउपवनसंरक्षक (वन्यजीव), पांढरकवडा