शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

शिधापत्रिकेतील ५६ हजार नावे रद्द

By admin | Updated: October 9, 2016 00:17 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार दूर करण्यासाठी पुरवठा विभागाने राबविलेल्या एक्झासिस्टींग राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमने (ईआरसीएमएस) जिल्ह्यातील ५६ हजार नावे राशन कार्डातून रद्द झाली आहे.

आधारने बिंग फोडले : ‘ईआरसीएमएस’चा पहिला टप्पायवतमाळ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार दूर करण्यासाठी पुरवठा विभागाने राबविलेल्या एक्झासिस्टींग राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमने (ईआरसीएमएस) जिल्ह्यातील ५६ हजार नावे राशन कार्डातून रद्द झाली आहे. आधार क्रमांक यासाठी सक्तीचा करण्यात आल्याने हे बिंग फुटले आहे. यामुळे जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानातील गैरप्रकाराला आळा बसणार आहे.जिल्ह्यात रास्त भाव धान्य दुकानाच्या संदर्भात प्रशासनाकडे विविध तक्रारी येत होत्या. अधिक धान्य उचलूनही कमी धान्य वितरित केले जात असल्याची ओरड सातत्याने होती. अनेकदा राशन मात्र काळ्याबाजारात विकला जात होता. वेगवेगळ्या राशन कार्डावर एकाच व्यक्तीचे नाव आढळून येत होते. हा प्रकार थांबविण्यासाठी तीन वर्षांपासून ईआरसीएमएसच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले. राशन दुकानदारांचे डी-१ रजिस्टर क्रॉस चेक करण्यात आले. या मोहिमेचा पहिला टप्पा गत आठवड्यात संपला. त्यात अनेक गंभीर बाबी पुढे आल्या. एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या राशन कार्डावर असणे, गाव सोडून गेलेल्या व्यक्ती, मृत व्यक्ती आणि लग्न झालेल्या मुलींचीही नावे राशन कार्डावर आढळून आली. ईआरसीएमएसमुळे हे बिंग फुटले असून त्यासाठी आधार क्रमांकाची मदत घेण्यात आली. त्यामुळे एकाच व्यक्तीची दोनदा असलेली नोंद रद्द करण्यात आली. जिल्ह््यात असे ५६ हजार नावे पुढे आले आहे. हे बिंग फुटल्याने आता राशन दुकानदारांना नवीन कोटा सुधारित नावानुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)राशनकार्ड आॅनलाईनईआरसीएमएस प्रक्रियेतून राशन कार्डाची आॅनलाईन नोंद करण्यात आली. त्यानंतर नावे वगळण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात राज्याच्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये ही नावे टाकली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाच लाख ६९ हजार शिधापत्रिका आहे. यात एक लाख १४ हजार २९२ अंत्योदय, दोन लाख ८८ हजार ३६३, प्राधान्य गटातील आणि ८८ हजार ३५९ एपीएल शिधापत्रिका आहे. जिल्ह्यात चार हजार ६९६ अन्नपूर्णा शिधापत्रिका असून ११ हजार २३० शुभ्र शिधापत्रिका आहे.पुरवठा विभागातील कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आरसी डिलशनची प्रक्रिया नुकतीच पार पाडली. यातून ५६ हजार व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहे.- शालीग्राम भराडी,जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ