शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

५६ लाख ज्येष्ठ नागरिकांची ‘कोशियरी’साठी आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 18:06 IST

किमान निवृत्तीवेतनात वाढ करण्यासह पेन्शनर्सच्या महागाई भत्त्यातही वाढीची शिफारस कोशियरी समितीने केंद्र शासनाकडे २०१२ मध्येच केली. मात्र, पाच वर्ष उलटूनही देशभरातील ५६ लाख पेन्शनर्स या शिफारशींचा लाभ घेऊ शकले नाही. या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मनुष्यबळ विकासमंत्री विसरून गेले आहेत.

ठळक मुद्देपेन्शन वाढवामनुष्यबळ विकास मंत्री आश्वासन विसरले, आता पंतप्रधानांना साकडे

अविनाश साबापुरे ।यवतमाळ : किमान निवृत्तीवेतनात वाढ करण्यासह पेन्शनर्सच्या महागाई भत्त्यातही वाढीची शिफारस कोशियरी समितीने केंद्र शासनाकडे २०१२ मध्येच केली. मात्र, पाच वर्ष उलटूनही देशभरातील ५६ लाख पेन्शनर्स या शिफारशींचा लाभ घेऊ शकले नाही. या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मनुष्यबळ विकासमंत्री विसरून गेले आहेत. त्यामुळे आता पेन्शनर्स पंतप्रधानांकडे साकडे घालणार आहेत.ईपीएस १९९५ योजनेचे ५६ लाखाहून अधिक निवृत्तीवेतनधारक देशात आहेत. किमान जीवन जगण्याएवढी पेन्शन मिळावी, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. या विरोधात निवृत्त कर्मचारी समन्वय राष्ट्रीय समितीने अखंड संघर्ष केल्यानंतर ईपीएस योजनेत सुधारणा करण्यासाठी भगतसिंग कोशियरी यांच्या अध्यक्षतेत समिती नेमण्यात आली होती. या समितीने २०१२ मध्ये आपला अहवाल केंद्र शासनाला सादर केला. त्यात निवृत्तीवेतन धारकांना किमान ३ हजार मासिक पेन्शन मिळावी, महागाईच्या प्रमाणानुसार महागाईभत्ता लागू करण्यात यावा या प्रमुख शिफारशी कोशियरी समितीने केल्या आहेत. परंतु, पाच वर्ष उलटूनही या अहवालावर संसदेच्या कोणत्याच सभागृहात साधी चर्चाही झालेली नाही.विशेष म्हणजे, तत्कालीन राज्यसभा खासदार आणि विद्यमान मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी या शिफारशींचे स्वागत केले होते. १ सप्टेंबर २०१३ रोजी सेवाग्राममध्ये झालेल्या पेन्शनर्स महाअधिवेशनात जावडेकर यांनी भाजपाची सत्ता येताच तीन महिन्यात कोशियरी समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे २०१४ मध्ये सत्तापालट होताच निवृत्तवेतनधारकांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र अडीच वर्षाहून अधिक काळ लोटल्यावरही सरकारची याबाबत काहीच हालचाल नाही. त्यामुळे देशभरातील लाखो पेन्शनधारक आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच भेटून समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करणार आहेत.देशभरातील पेन्शनर्सचे नागपुरात शक्तिप्रदर्शनकोशियरी समितीच्या शिफारशींकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे. त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी देशभरातील पेन्शनधारक ५ आॅगस्ट रोजी नागपुरात राष्ट्रीय महासंमेलनासाठी गोळा होणार आहेत. या संमेलनात किमान १ लाख ज्येष्ठ नागरिक एकत्र येतील, असा दावा निवृत्त कर्मचारी समन्वय समितीचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश पाठक, राष्ट्रीय समन्वय समितीचे यवतमाळ येथील सदस्य के. डब्ल्यू. धोटे, पी. एम. हरणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ६० वर्षांवरील वयाच्या लाखो पेन्शनर्समध्ये विधवांचाही समावेश आहे. व्हीआरएस घेणारे, ज्यांच्या कंपन्या बंद पडल्या असे कर्मचारी आदींचा यात समावेश आहे. २५ लाखांहून अधिक पेन्शनर्स तर आजारी आहेत. त्यांच्या हक्कासाठी नागपुरातून कोशियरी कमिटीसाठी आवाज उठविण्यात येणार आहे.