शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

५२ कोटींचा कापूस पाण्यात

By admin | Updated: January 7, 2015 22:58 IST

पणन महासंघाने जिल्ह्यातील विविध केंद्रांवर खरेदी केलेला कापूस अवकाळी पावसाने ओला झाला. दुर्गंधी सुटलेला कापूस कोरडा करण्यासाठी जागा मिळेल तिकडे पसरविण्यात आला आहे.

दुर्गंधी सुटली : अनिश्चित काळासाठी खरेदी बंद, खासगी दर घसरले यवतमाळ : पणन महासंघाने जिल्ह्यातील विविध केंद्रांवर खरेदी केलेला कापूस अवकाळी पावसाने ओला झाला. दुर्गंधी सुटलेला कापूस कोरडा करण्यासाठी जागा मिळेल तिकडे पसरविण्यात आला आहे. दरम्यान, पणन महासंघाने अनिश्चित काळासाठी खरेदी बंद केली आहे. याच संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत. यवतमाळ आणि वणी विभागात केंद्रांवर पणन महासंघाने नाफेडच्या मदतीने कापूस खरेदी केली. व्यापाऱ्यांकडून मिळणारा कमी दर आणि बोनसच्या आशेने शेतकऱ्यांनी आपला कापूस मोठ्या प्रमाणात पणनला दिला. मोठ्या प्रमाणात आलेला कापूस अवकाळी पावसाने भिजला. एवढेच नाही तर, वाहते पाणी कापसाच्या गंजी खालून वाहून गेले. सलग आठ दिवस ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे ओला झालेला कापूस वाळविणे शक्य झाले नाही. परिणामी कापसाची गंजी लागली आणि यातून संपूर्ण कापसाला दुर्गंधी सुटली. आता वातावरण स्वच्छ होताच मजुरांच्या मदतीने कापसाची गंजी कोरडी करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.यवतमाळ आणि वणी विभागात नऊ केंद्रांवर एक लाख २९ हजार १३९ क्विंटल कापसाची खरेदी झाली. बाजार दरानुसार खरेदी झालेला हा कापूस ५२ कोटी ३० लाख १२ हजार ९५० रुपयांचा आहे. कापूस ओला झाल्याने त्याची प्रत घसरणार आहे. परिणामी महासंघाला मोठे नुकसान सोसावे लागण्याची शक्यता आहे.जिनिंगमध्ये असलेली आरक्षित जागा कापूस वाळण्यासाठी अपुरी पडत आहे. यामुळे पणन महासंघाने सर्वच केद्रांवर अनिश्चित काळासाठी खरेदी बंद केली आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. पूर्वी खासगी व्यापाऱ्यांचा आणि पणनचा दर सारखाच होता. खरेदी बंद होताच कापसाचा दर चार हजारावरून तीन हजार ८०० रुपयांपर्यंत खाली आला. क्विंटलमागे २०० रुपयांची घसरण झाली आहे. या स्थितीने सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असतानाच हे संकट हवालदिल करणारे आहे. (शहर वार्ताहर)शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करताना मॉश्चर मीटर लावण्यात आले. आठ पेक्षा अधिक मॉश्चर (ओलावा) असलेला कापूस पणनने परत पाठविला. चांगली प्रतवारी जपता यावी, यासाठी ही दक्षता घेण्यात आली. मात्र अवकाळी पावसाने पणनच्या या सर्व प्रयत्नावर पाणी फेरले गेले.... तरी दर पडलेसरकी आणि रूईच्या दरावर कापसाचा दर निश्चित होतो. १५०० रुपये क्विंटलची सरकी १६५० रुपयाच्या घरात पोहोचला आहे. रूईचे दर प्रतिखंडी ३३ हजार ६०० रूपयावरून ३४ हजार २०० रुपयावर पोहोचले आहे. यामध्ये ६०० रुपयांची वाढ झाली आहे. यातून कापसाचे दर वाढण्याची शक्यता असतानाही पणनची खरेदी बंद होताच व्यापाऱ्यांनी दर पाडले.