शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

भटक्यांच्या पालातील खड्ड्यात ५१ मोबाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:07 PM

भटक्यांच्या पालात खड्ड्यात पुरुन ठेवलेले ५१ महागडे मोबाईल आढळण्याची खळबळजनक घटना महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे रविवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देहिवरा संगमचा प्रकार : बाजारातील चोरीने बिंग फुटले

ऑनलाईन लोकमतमहागाव/हिवरासंगम : भटक्यांच्या पालात खड्ड्यात पुरुन ठेवलेले ५१ महागडे मोबाईल आढळण्याची खळबळजनक घटना महागाव तालुक्यातील हिवरासंगम येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. गुंज येथील बाजारात मोबाईल चोरट्याला नागरिकांनी पकडल्यानंतर मोबाईल चोरीचे हे रॅकेटच पोलिसांच्या हाती लागले. महागाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.महागाव तालुक्यात गत काही दिवसांपासून मोबाईल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. गुंज येथे शनिवारी असलेल्या बाजारात नागरिकांनी एका मोबाईल चोरट्याला रंगेहात पकडले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यावरून पोलिसांनी रविवारी पहाटे हिवरासंगम येथील गावाबाहेर असलेल्या पालावर धाड टाकली. त्या ठिकाणी पालात खड्डा खोदून ५१ मोबाईल लपवून ठेवल्याचे आढळून आले. पालातील खड्ड्यातून महागडे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले. दरम्यान या प्रकरणी बाबू उर्फ बाबय्या सुरगुडू (२८), एम. रामलू लक्ष्मणय्या (३६), एम. सामलू लक्ष्मणय्या (३०) सर्व रा. हैदराबाद यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या पालातून मोबाईल हस्तगत केले.महागाव शहरासह तालुक्यात अनेक महागडे मोबाईल गत काही दिवसांपासून चोरीला जात होते. अनेक पोलिसांचेही मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहे. आता या टोळीचा छडा नागरिकांच्या सतर्कतेनेच लागला आहे. आंध्रप्रदेशातील असलेल्या या मोबाईल चोरट्यांच्या टोळीत आणखी सदस्यांचा समावेश असावा असा कयास आहे.जिल्ह्यात दररोज मोबाईलच्या चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. आठवडी बाजारासह गर्दीच्या ठिकाणी महागडे मोबाईल अलगद लंपास केले जात आहे. परंतु चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागले नाही. दरम्यान महागाव पोलिसांनी ही टोळी पकडल्याने मोबाईल चोरट्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.भीक मागण्याच्या नावाखाली चोरीमोबाईल चोरट्यांच्या टोळीत काही अल्पवयीन मुलेही आहेत. भीक मागण्याच्या नावाखाली गर्दीत शिरुन महागडे मोबाईल लंपास करीत होते. चोरलेले मोबाईल ज्या ठिकाणी मुक्काम असेल त्या ठिकाणच्या पालात खड्डा करून पुरले जात होते. त्यानंतर या मोबाईलची विल्हेवाट लावली जात होती.