शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’ने पाठविले ५०० कामगारांना रजेवर

By admin | Updated: April 4, 2017 00:12 IST

तालुक्याची कामधेनू असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली असून कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना अर्धपगार रजेवर पाठविले आहे.

अखेरची घरघर : ऊस उत्पादक व कामगारांत खळबळअविनाश खंदारे उमरखेडतालुक्याची कामधेनू असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली असून कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना अर्धपगार रजेवर पाठविले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक व कामगारांत एकच खळबळ उडाली आहे.तालुक्यातील पोफाळी येथे १९६९ साली तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेने वसंत साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली. उमरखेड, पुसद, महागाव, हदगाव, हिमायतनगर या पाच तालुक्यांत कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. १९७३ साली प्रथम गाळप हंगामापासून २०१५ पर्यंत सतत गाळप होत राहिले. त्यामुळे या परिसरात आर्थिक समृद्धी आली. ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी यांना चांगले दिवस आले. परंतु गत काही वर्षांपासून कारखान्याला उतरती कळा लागली. गत २२ महिन्यांपासून कामगारांना वेतन दिले नाही. कामगारांनी वारंवार आंदोलने केली. प्रशासन व कामगार संघटनांत अनेक वाद झाले. पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली. दरम्यान, गतवर्षी वसंत कारखान्याची निवडणूक झाली. सर्व नेत्यांनी एकत्र बसून कारखाना सुरू राहिला पाहिजे, यासाठी निवड अविरोध केली. हदगावचे माजी आमदार माधवराव पाटील यांची अध्यक्षपदी तर कृष्णा पाटील देवसरकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. गतवर्षी क्षमतेएवढे गाळपच झाले नाही. केवळ २३ हजार ५०० टन गाळप होवून कारखान्याचा पट्टा पडला. वसंत कारखान्याची परिस्थिती अतिशय हालाखीची झाली. गत २२ महिन्यांपासून कामगारांचे पगार नाही, पाच कोटी वेतनाचे आणि पाच कोटी ग्रॅज्युटीचे घेणे आहे. सोसायटीचे दीड कोटी, फंडाचे दोन कोटी, व्यापारी पेमेंट दोन कोटी अशी १५ कोटींपेक्षा अधिक देणी आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळांनी वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अर्धपगारी रजेवर जाण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. हा प्रकार वसंतच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला. या निर्णयामुळे कामगारांत चांगलीच खळबळ उडाली आहे.ऊस उत्पादकांत रोषवसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगारांना रजेवर पाठविले आहे. गत दोन वर्षांपासून गाळप हवे तसे झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय कारखाना कायमचा बंद पाडण्यासाठी तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. उमरखेड तालुक्याची कामधेनू बंद पाडण्याचा घाट घातल्या जात असल्याचा आरोप ऊस उत्पादक करीत आहे.वसंत कारखान्याच्या संचालक मंडळाने बैठक घेऊन अधिकारी व कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. बँक संचालक मंडळ व शासनाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.- राजेंद्र खापडकार्यकारी संचालक, वसंत साखर कारखानावसंत कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना ले आॅफ दिला आहे. परंतु या कामगारांच्या कुटुंबांचा व त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, यासाठी कारखाना प्रशासनाने वसंतला भाडेतत्त्वावर द्यावा. त्यातूनच शेतकरी व कामगारांना दिलासा मिळेल.- व्ही.एम. पतंगरावकामगार नेते