शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

‘वसंत’ने पाठविले ५०० कामगारांना रजेवर

By admin | Updated: April 4, 2017 00:12 IST

तालुक्याची कामधेनू असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली असून कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना अर्धपगार रजेवर पाठविले आहे.

अखेरची घरघर : ऊस उत्पादक व कामगारांत खळबळअविनाश खंदारे उमरखेडतालुक्याची कामधेनू असलेल्या वसंत सहकारी साखर कारखान्याला अखेरची घरघर लागली असून कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना अर्धपगार रजेवर पाठविले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक व कामगारांत एकच खळबळ उडाली आहे.तालुक्यातील पोफाळी येथे १९६९ साली तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेने वसंत साखर कारखान्याची उभारणी करण्यात आली. उमरखेड, पुसद, महागाव, हदगाव, हिमायतनगर या पाच तालुक्यांत कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. १९७३ साली प्रथम गाळप हंगामापासून २०१५ पर्यंत सतत गाळप होत राहिले. त्यामुळे या परिसरात आर्थिक समृद्धी आली. ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी यांना चांगले दिवस आले. परंतु गत काही वर्षांपासून कारखान्याला उतरती कळा लागली. गत २२ महिन्यांपासून कामगारांना वेतन दिले नाही. कामगारांनी वारंवार आंदोलने केली. प्रशासन व कामगार संघटनांत अनेक वाद झाले. पोलिसांना हस्तक्षेप करण्याची वेळ आली. दरम्यान, गतवर्षी वसंत कारखान्याची निवडणूक झाली. सर्व नेत्यांनी एकत्र बसून कारखाना सुरू राहिला पाहिजे, यासाठी निवड अविरोध केली. हदगावचे माजी आमदार माधवराव पाटील यांची अध्यक्षपदी तर कृष्णा पाटील देवसरकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. गतवर्षी क्षमतेएवढे गाळपच झाले नाही. केवळ २३ हजार ५०० टन गाळप होवून कारखान्याचा पट्टा पडला. वसंत कारखान्याची परिस्थिती अतिशय हालाखीची झाली. गत २२ महिन्यांपासून कामगारांचे पगार नाही, पाच कोटी वेतनाचे आणि पाच कोटी ग्रॅज्युटीचे घेणे आहे. सोसायटीचे दीड कोटी, फंडाचे दोन कोटी, व्यापारी पेमेंट दोन कोटी अशी १५ कोटींपेक्षा अधिक देणी आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळांनी वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अर्धपगारी रजेवर जाण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. हा प्रकार वसंतच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आला. या निर्णयामुळे कामगारांत चांगलीच खळबळ उडाली आहे.ऊस उत्पादकांत रोषवसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने कामगारांना रजेवर पाठविले आहे. गत दोन वर्षांपासून गाळप हवे तसे झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय कारखाना कायमचा बंद पाडण्यासाठी तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. उमरखेड तालुक्याची कामधेनू बंद पाडण्याचा घाट घातल्या जात असल्याचा आरोप ऊस उत्पादक करीत आहे.वसंत कारखान्याच्या संचालक मंडळाने बैठक घेऊन अधिकारी व कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. बँक संचालक मंडळ व शासनाच्या निर्णयानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.- राजेंद्र खापडकार्यकारी संचालक, वसंत साखर कारखानावसंत कारखाना प्रशासनाने ५०० कामगारांना ले आॅफ दिला आहे. परंतु या कामगारांच्या कुटुंबांचा व त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, यासाठी कारखाना प्रशासनाने वसंतला भाडेतत्त्वावर द्यावा. त्यातूनच शेतकरी व कामगारांना दिलासा मिळेल.- व्ही.एम. पतंगरावकामगार नेते