शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज्यातील ८९ बी.एड महाविद्यालयांतील ५०० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:00 IST

Yavatmal : ८९ बीएड महाविद्यालयांना अनुदान देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद (यवतमाळ): २००१ पूर्वीच्या बी.एड महाविद्यालयांना अनुदान नसल्याने राज्यातील ८९ महाविद्यालयांतील ५०० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व महाविद्यालयांना तत्काळ अनुदान देऊन सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, असे साकडे विनाअनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी असोसिएशनने उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे घातले आहे. २४ नोव्हेंबर २००१ नंतर सरकारने विनाअनुदानित धोरण स्वीकारले. तत्पूर्वीची सर्व महाविद्यालये अनुदानास पात्र आहेत. याच धोरणानुसार राज्यात २००१ पूर्वीची कला, विज्ञान व वाणिज्य शाखांची वरिष्ठ महाविद्यालये अनुदानित झाली आहेत. 

२००१ पूर्वी स्थापित झालेली ८९ शिक्षणशास्त्र महाविद्यालये अनुदानास पात्र आहेत. सद्यस्थितीत या महाविद्यालयांपैकी काही महाविद्यालये बंद झाली आहेत. सुमारे ८० महाविद्यालये चालू असून, त्यांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी प्रा. डॉ. अनंत तायडे, प्रा. डॉ. शरद ठाकरे, प्रा. डॉ. संजय खुपासे, प्रा. डॉ. संदीप मोरांडे, प्रा. डॉ. अविनाश कोहळे, प्रा. डॉ. मेघना राऊत, प्रा. डॉ. नलिता माकोडे, प्रा. राजेश्वर मावलीकर, प्रा. त्र्यंबक कोल्हे, भाऊ श्रीवास्तव, शेख जावेद, रवी राठोड, सय्यद सादिक आदी कर्मचारी उपस्थित होते.

तपासणीची प्रक्रिया झाली पूर्ण२०१३ पासून शासनाने या महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करून महाविद्यालयांची माहिती मागवणे, महाविद्यालयांच्या तपासण्या करणे, बैठकांचे आयोजन करणे आदी प्रक्रिया पूर्ण केल्या आहे. २०१४ मध्ये शिक्षण खात्याची सकारात्मक शिफारस अर्थखात्याकडे दिली होती. शिक्षण संचालक, उच्चशिक्षण, पुणे यांच्या आदेशानुसार सदर सर्व महाविद्यालयांची अनुदान देण्यासंदर्भात तपासणी १७ ते २२ जानेवारी २०२२ या कालावधीत पूर्ण झाली. सर्व अहवालांची छाननी होऊन ते मंत्रालयात सादर करण्यात आले आहेत.

"२४ नोव्हेंबर २००१ पूर्वीच्या विनाअनुदानित बी.एड महाविद्यालयांना अनुदान मिळावे, ही राज्यातील कर्मचाऱ्यांची रास्त मागणी आहे. यासाठी आपण स्वतः सकारात्मक असून, यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी लवकरच चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल."- इंद्रनील नाईक, राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य.

टॅग्स :Educationशिक्षणYavatmalयवतमाळ