शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

निळोणाच्या मृतसाठ्यात ५० टक्के घट

By admin | Updated: May 5, 2016 02:31 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पाच्या मृत साठ्यातही ५० टक्याने घट झाली असून त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे.

भिस्त चापडोहवर : पाणी चार दिवसाआड होण्याची शक्यतायवतमाळ : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पाच्या मृत साठ्यातही ५० टक्याने घट झाली असून त्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. अशा परिस्थितीत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यात आहे. शहराची संपूर्ण भिस्त आता चापडोह प्रकल्पावर आहे.वाढत्या तापमानाने शहराला निळोणा प्रकल्पाच्या पाणी पातळीत झपाट्याने घसरण होत आहे. सध्या धरणातील मृत साठ्यावर शहराचा पाणीपुरवठा अवंबून आहे. मात्र आता मृत साठ्यातही प्रचंड घट होत आहे. गेल्या काही दिवसात हा साठा निम्यावर आला आहे. गत १५ दिवसात ही अवस्था निर्माण झाल्याने सोमवार ९ मे रोजी पाणी साठा मोजला जाणार आहे. त्यानंतर पावसाळ्यापर्यंत पाणी कसे पुरविता येईल यासाठी वेळापत्रक तयार केले जाणार आहे. धरणातील पाण्याचे तापमानामुळे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे जलसाठा दररोज दोन इंचाने कमी होत आहे. पावसाळा लांबल्यास शहराची संपूर्ण भिस्त चापडोहवरच राहणार आहे. चापडोह प्रकल्पात सध्या साठवण क्षमतेच्या ४० टक्के पाणी आहे. चार ते पाच महिने पाणी पुरेल इतका हा साठा आहे. मात्र यासाठी आवश्यक जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने पाणी उपसणे शक्य नाही. धरणातील पाणी पातळीचा अभ्यास करण्यासाठी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर सोमवारी पाहणी करणार आहे. त्यानंतर चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेणार आहेत. (शहर वार्ताहर)