शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

खासदार आमदारांचा ५० टक्के निधी शासनस्तरावरूनच कपात करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 11:12 IST

खासदार व आमदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतून पन्नास टक्के निधी शासनाने कोरोनाच्या संकटासाठी थेट कपात करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावरील राजकीय टीका टाळण्याचेही आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खासदार व आमदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतून पन्नास टक्के निधी शासनाने कोरोनाच्या संकटासाठी थेट कपात करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे. त्या निधीतून शासनाने या आजारासाठी लढण्याकरिता नियोजन करावे अशी अपेक्षा देवानंद पवार यांनी व्यक्त केली आहे.दरवर्षी शासनस्तरावरून खासदार व आमदारांना स्थानिक विकासनिधी दिला जातो. त्या निधीतून आपापल्या भागातील विकासकामे करायची असतात. हा निधी जनतेच्या पैशातूनच लोकप्रतिनिधींना दिल्या जाते. कोरोनाचे संकट अतिशय भयंकर आहे, संपूर्ण जग या संकटाचा सामना करत आहे. अशा प्रसंगी मानवतेचा परिचय देण्याची सर्वांची भूमिका असली पाहिजे. खासदार आमदारांना त्यांचा स्थानिक विकासनिधी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी वापरण्याची केंद्र व राज्य सरकारने मुभा दिली आहे.शासनाने खासदारांचा निधी केंद्र स्तरावर व आमदारांचा निधी राज्यस्तरावर थेट उपयोगात आणावा अथवा हे लोकप्रतिनिधी ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना व नोडल अधिकाºयांना हा निधी कपात करून तो खर्च करण्याचा अधिकार शासनाने द्यावा त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारशींची अट ठेऊ नये अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस