शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

खासदार आमदारांचा ५० टक्के निधी शासनस्तरावरूनच कपात करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 11:12 IST

खासदार व आमदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतून पन्नास टक्के निधी शासनाने कोरोनाच्या संकटासाठी थेट कपात करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियावरील राजकीय टीका टाळण्याचेही आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खासदार व आमदारांना दिल्या जाणाऱ्या विकासनिधीतून पन्नास टक्के निधी शासनाने कोरोनाच्या संकटासाठी थेट कपात करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (विदर्भ विभाग) देवानंद पवार यांनी केली आहे. त्या निधीतून शासनाने या आजारासाठी लढण्याकरिता नियोजन करावे अशी अपेक्षा देवानंद पवार यांनी व्यक्त केली आहे.दरवर्षी शासनस्तरावरून खासदार व आमदारांना स्थानिक विकासनिधी दिला जातो. त्या निधीतून आपापल्या भागातील विकासकामे करायची असतात. हा निधी जनतेच्या पैशातूनच लोकप्रतिनिधींना दिल्या जाते. कोरोनाचे संकट अतिशय भयंकर आहे, संपूर्ण जग या संकटाचा सामना करत आहे. अशा प्रसंगी मानवतेचा परिचय देण्याची सर्वांची भूमिका असली पाहिजे. खासदार आमदारांना त्यांचा स्थानिक विकासनिधी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी वापरण्याची केंद्र व राज्य सरकारने मुभा दिली आहे.शासनाने खासदारांचा निधी केंद्र स्तरावर व आमदारांचा निधी राज्यस्तरावर थेट उपयोगात आणावा अथवा हे लोकप्रतिनिधी ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना व नोडल अधिकाºयांना हा निधी कपात करून तो खर्च करण्याचा अधिकार शासनाने द्यावा त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या शिफारशींची अट ठेऊ नये अशी मागणीही पवार यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस