शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
7
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
8
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
9
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
10
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
11
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
12
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
13
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
14
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
15
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
16
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
17
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
18
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
19
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
20
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ५० लाख रुपये अडकले; तुरीच्या चुकाऱ्याला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 10:41 IST

दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे ५० लाख रुपयांच्यावर चुकारे अद्याप करण्यात आले नाहीत. अनेक दिवसांपासून मालाची रक्कम अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील शेतकरी त्रस्त

मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे ५० लाख रुपयांच्यावर चुकारे अद्याप करण्यात आले नाहीत. अनेक दिवसांपासून मालाची रक्कम अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.नाफेडला शेतमालाची विक्री केल्यानंतर चोवीस तासाच्या आत चुकारा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु अनेक महिने झाले तरी शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पैसे कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागील हंगामात दारव्हा येथील शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर तालुक्यातील ६ हजार नऊशे शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली होती. त्यामधील १ हजार २५७ शेतकऱ्यांनी १९ हजार तीनशे ४८ क्विंटल तुरीची विक्री केली होती. तर २५७ शेतकऱ्यांनी ३ हजार आठशे ९५ क्विंटल हरभरा विकला. यामधील २५६ शेतकऱ्यांच्या खात्यात हरभऱ्याचे १ कोटी ७१ लाख ३८हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. परंतु तुरीचे मात्र २० नोव्हेंबर पर्यंत ५० शेतकऱ्यांचे १ हजार ५५ क्विंटलचे ५६ लाख ९७ हजार रुपये मिळाले नाही. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतमालाचे हमीभाव, योग्य मोजमाप व विकलेल्या मलापोटी २४ तासात चुकारा देण्याची घोषणा या सर्व बाबींमुळे शासनाच्या वतीने नाफेडमार्फत उघडण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्राकडे मोठ्या संख्येने शेतकरी वळले आहे. परंतु शेतमाल विकल्यानंतर वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केल्या जात आहे. २४ तास सोडा अनेक महिने होऊन सुद्धा पैसे न मिळाल्याच्या तक्रारी असून त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. हातात पैसे न मिळाल्याने या शेतकऱ्यांना दिवाळीत चणचण भासली. त्याचबरोबर सध्या रब्बी हंगामासाठी आवश्यकता असतांना शेतमाल विकून सुद्धा पैसे मिळाले नाही. त्यामुळे आता आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल उपस्थित होत असून तात्काळ बँक खात्यात पैसे जमा करण्याची मागणी आहे.पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेअनेक महिन्यांपासून तुरीचे पैसे अडकले असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय,कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाकडे चौकशी केली असता नाफेडला विकलेल्या हरभऱ्याचे पैसे एक वगळता सर्वांना मिळाले. तर तुरीची रक्कम सुद्धा दररोज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी