शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे ५० लाख रुपये अडकले; तुरीच्या चुकाऱ्याला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 10:41 IST

दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे ५० लाख रुपयांच्यावर चुकारे अद्याप करण्यात आले नाहीत. अनेक दिवसांपासून मालाची रक्कम अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुक्यातील शेतकरी त्रस्त

मुकेश इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाफेडला विकलेल्या तुरीचे ५० लाख रुपयांच्यावर चुकारे अद्याप करण्यात आले नाहीत. अनेक दिवसांपासून मालाची रक्कम अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.नाफेडला शेतमालाची विक्री केल्यानंतर चोवीस तासाच्या आत चुकारा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु अनेक महिने झाले तरी शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पैसे कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मागील हंगामात दारव्हा येथील शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावर तालुक्यातील ६ हजार नऊशे शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली होती. त्यामधील १ हजार २५७ शेतकऱ्यांनी १९ हजार तीनशे ४८ क्विंटल तुरीची विक्री केली होती. तर २५७ शेतकऱ्यांनी ३ हजार आठशे ९५ क्विंटल हरभरा विकला. यामधील २५६ शेतकऱ्यांच्या खात्यात हरभऱ्याचे १ कोटी ७१ लाख ३८हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. परंतु तुरीचे मात्र २० नोव्हेंबर पर्यंत ५० शेतकऱ्यांचे १ हजार ५५ क्विंटलचे ५६ लाख ९७ हजार रुपये मिळाले नाही. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शेतमालाचे हमीभाव, योग्य मोजमाप व विकलेल्या मलापोटी २४ तासात चुकारा देण्याची घोषणा या सर्व बाबींमुळे शासनाच्या वतीने नाफेडमार्फत उघडण्यात आलेल्या शेतमाल खरेदी केंद्राकडे मोठ्या संख्येने शेतकरी वळले आहे. परंतु शेतमाल विकल्यानंतर वेळेवर पैसे मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केल्या जात आहे. २४ तास सोडा अनेक महिने होऊन सुद्धा पैसे न मिळाल्याच्या तक्रारी असून त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे. हातात पैसे न मिळाल्याने या शेतकऱ्यांना दिवाळीत चणचण भासली. त्याचबरोबर सध्या रब्बी हंगामासाठी आवश्यकता असतांना शेतमाल विकून सुद्धा पैसे मिळाले नाही. त्यामुळे आता आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल उपस्थित होत असून तात्काळ बँक खात्यात पैसे जमा करण्याची मागणी आहे.पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेअनेक महिन्यांपासून तुरीचे पैसे अडकले असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय,कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाकडे चौकशी केली असता नाफेडला विकलेल्या हरभऱ्याचे पैसे एक वगळता सर्वांना मिळाले. तर तुरीची रक्कम सुद्धा दररोज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :Farmerशेतकरी