शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वणी आगाराच्या उत्पन्नात ५० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून एस.टी.ची चाके रूतून बसली होती. त्यानंतर २२ मेपासून ५० टक्के क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले. त्यात जून महिन्यामध्ये वणी आगाराला सात लाख ३९ हजार २४३ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलम्ौध्ये ५ लाख २३ हजार २६७ रूपयांचे, तर ऑगस्ट महिन्यात १२ लाख ३१ हजार ९६४ रूपयांचे, तर सप्टेंबर महिन्यात २९ लाख १३ हजार २६७ रूपयांचे उत्पन्न मिळाले.

ठळक मुद्दे‘लालपरी’ला प्रवाशांचा प्रतिसाद : लॉकडाऊन काळात मात्र कोटवधींचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मार्च महिन्याच्या २३ तारखेपासून लॉकडाऊनच्या काळात करोडो रूपयांचे नुकसान सहन करणारी लालपरी अर्थात महामंडळाची एस.टी.बस हळूहळू सावरू लागली आहे. पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची मुभा मिळाल्यानंतर वणी आगाराच्या उत्पन्नात ५० टक्के वाढ झाली आहे.लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून एस.टी.ची चाके रूतून बसली होती. त्यानंतर २२ मेपासून ५० टक्के क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले. त्यात जून महिन्यामध्ये वणी आगाराला सात लाख ३९ हजार २४३ रूपयांचे उत्पन्न मिळाले. जुलम्ौध्ये ५ लाख २३ हजार २६७ रूपयांचे, तर ऑगस्ट महिन्यात १२ लाख ३१ हजार ९६४ रूपयांचे, तर सप्टेंबर महिन्यात २९ लाख १३ हजार २६७ रूपयांचे उत्पन्न मिळाले. लॉकडाऊनपूर्वी हेच उत्पन्न पाचपटीत होते. डिसेंबर महिन्यात वणी आगाराला एक कोटी २१ लाख ९० हजार ५५८ रूपये, जानेवारी महिन्यात एक कोटी १३ लाख ७७ हजार ९२९, फेब्रुवारी महिन्यात एक कोटी १३ लाख ८९ हजार ६८२ रूपयांचे उत्पन्न वणी आगाराला झाले. मात्र कोरोनानंतर मार्च महिन्यापासून एसटीच्या उत्पन्नात कमालिची घट झाली. मागील आठवडाभरापासून वणी आगारातील एस.टी.बसेस पूर्ण क्षमतेने प्रवासी घेऊन रस्त्याने धावत आहेत. प्रवाशांचाही एसटीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र येथे पहायला मिळते. सध्यस्थितीत वणी आगाराला एका दिवशी एक लाख १० हजार रूपयापर्यंतचे उत्पन्न होत आहे. वणी आगारातून वणी-यवतमाळ, वणी-नागपूर, वणी-चंद्रपूर या मार्गाने प्रवासी वाहतूक केली जात आहे. दररोज पाच हजार ५०० किलोमीटरचा पल्ला वणी आगारातील बसेस गाठत आहेत. यवतमाळ व नागपुरसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दर तासाला बसेस सुटत आहेत.लॉकडाऊनच्या काळात एसटी बससेवा बंद असल्याने त्याचा फायदा खासगी वाहतुकदारांना झाला. विशेष म्हणजे प्रवासी वाहतूक करताना काही कठोर नियम घालून देण्यात आले होते. परंतु खासगी वाहतुकदारांकडून हे नियम पायदळी तुडविण्यात आले. खासगी वाहनात तर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून वाहतूक करण्यात आली.कर्मचारी पाच महिन्यांपासून वेतनाविनाएसटी बंद असल्याने उत्पन्नात घट आली. त्याचा फटका एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना बसला. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे वेतनच देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांवर उसणवारी करून जगण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :state transportएसटी