शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अपंगांचे पाच हजार बोगस प्रमाणपत्र रद्द

By admin | Updated: December 3, 2015 02:46 IST

राज्य शासनाने बोगस अपंगत्व प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सक्तीची केली आहे. यात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल पाच हजार प्रमाणपत्र बोगस आढळले..

तालुकास्तरावर केंद्रच नाही : आॅनलाईन अर्जासाठी वेटिंगरूपेश उत्तरवार यवतमाळ राज्य शासनाने बोगस अपंगत्व प्रमाणपत्रे रोखण्यासाठी आॅनलाईन प्रक्रिया सक्तीची केली आहे. यात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात तब्बल पाच हजार प्रमाणपत्र बोगस आढळले असून ते रद्द करण्यात आले आहे. नव्याने प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात केंद्र उघडण्याच्या सूचना आहेत. मात्र जिल्ह्यात मुख्यालयीच केंद्र आहे. एकाच ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक उमेदवार आहेत. या प्रक्रियेसाठी सहा महिन्यांचे वेटिंग आहे. अपंगांच्या आॅनलाईन प्रक्रियेसाठी संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात अपंगांच्या तपासणीसाठी केंद्र उघडण्याच्या सूचना आहेत. मात्र या ठिकाणी डोळे, आॅर्थोपेडिक, न्यूरोसर्जन, गायनिक, नाक-कान-घसा आणि मेडीसिनचे डॉक्टर नाहीत. यामुळे जिल्हा मुख्यालयीच अपंगांच्या नोंदणीचे केंद्र उघडण्यात आले आहे.जिल्ह्यात अपंगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे दर आठवड्याला मोठ्या प्रमाणात अपंग जिल्हा मुख्यालयी नोंद करण्यासाठी येतात. प्रत्येक अपंग व्यक्तीला आलेल्या दिवशी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्यासाठी तपासणी आणि विविध मते घेण्यासाठी पुढची तारीख घेतली जाते. प्रत्येक दिवशी केवळ २० ते २५ अपंगांची तपासणी शक्य होते. मात्र अनेक व्यक्ती दिलेल्या तारखेला पोहोचत नाही. यामुळे ६० उमेदवारांना पुढच्या तारखेला बोलावले जाते. त्यांची तपासणी करण्यात येते. प्रत्यक्षात जास्त उमेदवार आल्यास अनेकांना परत जावे लागते. यामुळेच तपासणीसाठी अनेक अपंग ‘वेटिंग’वर आहेत. सध्या सहा महिन्यांची ‘वेटिंग लिस्ट’ आहे. आजच्या तारखेत नोंद केल्यास जून २०१६ मधील १ तारखेलाच त्याची तपासणी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे अपंगांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. याच सुमारास विविध योजनेत आॅनलाईन अपंग प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. प्रमाणपत्र आॅनलाईन नसल्याने त्यांना मदतीस मुकावे लागत आहे. अपंगांना मिळणाऱ्या सवलती लक्षात घेत धडधाकट व्यक्तींनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले आहेत. सध्याच्या आॅनलाईन प्रक्रियेने हे वास्तव उघड केले आहे. यात तब्बल पाच हजार प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहेत. तर चार हजार अपंगांना प्रमाणपत्र मिळाले आहे. जवळपास पाच हजार उमेदवार अपंगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीत आहेत. अनेक अपंग अजूनपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत पोहोचले नाही.