शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

तांडावस्ती विकासाचे पाच कोटी मिळूनही ‘तारीख पे तारीख’

By admin | Updated: June 11, 2016 02:46 IST

शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाला तांडावस्तीच्या विकासासाठी पाच कोटी रुपये प्राप्त झाले आहे.

विशेष समाज कल्याण : कामे रखडली, पावसाळ्यामुळे पुन्हा प्रतीक्षा यवतमाळ : शासनाच्या विशेष समाज कल्याण विभागाला तांडावस्तीच्या विकासासाठी पाच कोटी रुपये प्राप्त झाले आहे. मात्र त्यातील कामांची मंजुरी देण्यास हेतुपुरस्सर टाळले जात असल्याचा सूर आहे. प्रत्येक वेळी ‘तारीख पे तारीख’ देऊन लोकप्रतिनिधींनाही फिरविले जात आहे. जिल्ह्यात तांडावस्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या तांड्यांच्या विकासासाठी शासनाने पाच कोटी रुपये जिल्ह्याला पाठविले आहे. विशेष समाज कल्याण विभागामार्फत हा निधी खर्च केला जातो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हेतुपुरस्सर या निधीतील प्रस्तावांना मंजुरी देणे टाळले जात आहे. समाज कल्याण अधिकाऱ्याकडून प्रत्येक वेळी तांत्रिक तर कधी समितीचा आडोसा घेऊन वेळ मारुन नेली जात आहे. लोकप्रतिनिधींनी विचारणा केल्यास ‘आज करतो, उद्या करतो’ अशी उत्तरे दिली जातात. मात्र प्रत्यक्षात या अधिकाऱ्याचा आज-उद्या अद्यापही निघालेला नाही. पर्यायाने पाच कोटींचा निधी समाज कल्याण विभागाच्या तिजोरीत पडून आहे. वास्तविक आतापर्यंत तांडा वस्तीच्या विकासाची कामे पावसाळ्यापूर्वीच मार्गी लागणे गरजेचे होते. आता मंजुरी झाली तरी ऐन पावसाळ्यात कामे करायची कशी असा प्रश्न निर्माण होणार आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्यच काय तर आमदारांनाही फिरविण्याचे, वेळ मारून नेण्याचे कसब समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त केल्याचे दिसते. त्यामुळेच की काय तांडा वस्तीचे पाच कोटी रुपये पडून असूनही एकाही आमदाराने ते का खर्च होत नाही, म्हणून आक्रमक भूमिका घेतल्याचे अद्याप ऐकिवात नाही. समाज कल्याणच्या या तांडा वस्तीत विकासासाठी स्वतंत्र समिती आहे. परंतु युती शासनाने त्याचे अध्यक्ष नियुक्त केलेले नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सध्या प्रभारी अध्यक्ष आहेत. नेमके हेच कारण सांगून वेळ मारून नेली जात आहे. पाच कोटींचा हा निधी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यामागे ‘टक्केवारी’चे गणित असल्याची चर्चा समाज कल्याण विभागात आहे. (प्रतिनिधी)